नाशिक लोकसभा मतदारसंघ वार्तापत्र
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी -नवनाथ गायकर
लोकसभा निवडणुक आता कोणत्याही क्षणी जाहिर होणार आहे. या पाश्र्वभूमीवर इच्छुक उमेदवाराचीं धावपळ सुरू झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.यामुळे यावर शिवसेनेचा अग्रहक्क असला तरी भाजपा इच्छुक उमेदवारासह अनेकानीं निवडणुकीत उतरण्यासाठी कंबर कसल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमात पडले आहे. तर भाजप शिवसेनेत या जागेसाठी रस्सीखेच सुरु असल्याने महायुती समोरील अडचणीत वाढ झाली आहे.
राज्यात सत्ता परिवर्तनानंतर भाजप, शिवसेना व रा.का.चे दारु चोखुर उधळत आहे. ४०० पार चा आत्मविश्वासाने हे पक्ष जोशात आहे.त्यामुळेच महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवाराचींही भाऊगर्दी वाढली आहे.
या जागेवर खरेतर शिवसेनेचा आधिकार आहे. पण भाजप ही या जागेसाठी आग्रही आहे.यामुळे पेच फसला आहे.
भाजप कडुन नाशिक मनपा नगरसेवक दिनकर पाटिल यांनी वर्षभर अगोदर पासुनच मोर्चेबांधणी केली आहे.पाटलानीं आक्रमक प्रचारही सुरु केला आहे.
दुसरीकडे नुकतेच भाजपावासी झालेले महाराज स्वामी श्रीकंठानंद हे ही सक्रिय झाले असुन उमेदवारीच्या रिंगणात आहेत.
शांतिगीरी महाराज यांनी राजकारणाचे शुद्धीकरणचा नारा देत बिगुल फुंकले आहे.ते ही भाजप च्या संपर्कात असल्याची चर्चा असुन उमेदवारी मिळाली तर ठीक नाही तर अपक्ष तयारी सुरु आहे. शांतीगीरी महाराज यांची अपक्ष उमेदवारी हिंदुत्ववादी मताचें विभाजन करणारी ठरणार असुन याचा थेट फटका महायुती ला बसणार आहे. एक एक जागा साठी ताकद पणाला लावणार्या भाजपला हे परवडणारे नाही.
दुसरीकडे विदयमान खासदार हेंमत गोडसे हे तिसर्यादां लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक आहेत.मात्र उमेदवारी मिळवतानां गोडसेनां मोठी कसरत करावी लागते आहे.
गत दोन लोकसभा निवडणुकीत छोटे व मोठे भुजबळ (समीर भुजबळ व छगन भुजबळ) विरुद्ध गोडसे अशी लढाई झाली होती. त्यात मराठा समाजाची एकगठ्ठा मते मिळवत व मोदी लाटेचा फायदा घेत गोडसेनीं बाजी मारली होती.
दरम्यान ही समीकरणे लक्षात घेऊनच यावेळी विरोधकही सावध झाले असुन मराठा समाजाचेच उमेदवार ते रिंगणात उतरवणार असल्याचे निश्चिंत झाले आहे. त्यामुळे यावेळी महायुतीला मराठा कार्ड वापरता येणार नाही. याच बरोबर मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन व सरकार विरुद्ध नाराजीचाही सामना महायुतीला करावा लागणार आहे.
एकुणच यंदा या मतदारसंघात महायुतीची वाट बिकट दिसते आहे. महायुतीला मोदी लाटेवरच जास्त भरवसा असुन नाशिक मध्ये मोदी लाट महायुतीला तारेल का हा सवाल आहे.