सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर येथे शेतकर्याना मोदी सरकारच्या धोरणा नुसार वाढीव कर्ज पुरवठा करावा व पिक कर्ज भरणाऱ्या शेतकर्याना व नवीन कम .मंजूर करुन वाढीव कर्ज देण्यात यावे ज्या सोसायटी 100 टक्के वसुली करतात त्याना कर्ज वाटप करावे बँक शेतकऱ्यांची असताना ज्या माजीसंचालक व कारखानदारांनी कर्ज काढून बँक अडचणीत आणली त्याना पुन्हा कर्ज देऊ नये या मागणी साठी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे व बँकेचे व्यवस्थापक देसाई यांना भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर याचे नेतृत्वात भेटून निवेदन दिले.
यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड उपसभापती राजुबापु गावडे पांडुरंग कारखान्याचे माजी संचालक दिलीपराव चव्हाण द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत भैय्या देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजीराव पवार मच्छिंद्र नकाते प्रमोद बाबर सर्जेराव होनमाने धनाजी पवार सोमनाथ माने यांचे सह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी प्राधान्य देत असताना व कर्ज वाटपात प्रचंड निधी देत असताना तशा सूचना सर्व बँकांना देत असताना सुद्धा सोलापूर जिल्ह्याची शेतकऱ्यांची बँक असताना शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात शेअर्स व ठेवी असताना सुद्धा ही बँक पाठीमागच्या संचालक मंडळाने गलथान कारभार करत डबघाईला आणली होती.
परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमून बँक नफ्यात आणली आहे तरीसुद्धा प्रशासक व बँकेचे व्यवस्थापक हे नियमावर बोट ठेवून ज्या कर्जदाराने सोसायटीने कर्ज 100% भरून सुद्धा वाढीव कर्ज शेतकऱ्यांना दिले जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी प्रचंड योजना राबवत असताना ही बँक सध्या धन दांडग्या कारखान्यांना कर्ज देऊन शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून अडचणीत आणत आहे.
बिनव्याजी 3 लाख रुपये कर्ज मिळत असताना सुद्धा या योजनेपासून बँकेच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना कर्जा पासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे आज आम्ही हे निवेदन देऊन विनंती केली आहे लवकरच बँकेने कर्ज नाही दिले तर बँकेसमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासक व बँक व्यवस्थापक यांची राहील.
अशा प्रकारचे निवेदन आज आम्ही दिले आहे दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तर दिले असून लवकरच आम्ही कर्ज पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले आहे.