मोहोळ प्रतिनिधी
राजू खरे ! केवळ राजू खरे नव्हे, तर एक दिलदार आणि शब्दांचा पक्का असा हा परोपकारी माणूस. ज्यांना लोक भावी आमदार म्हणू लागले आहेत. समाजातील अनेकजण स्वत:ची आरती, स्वत:च ओवाळून घेतात आणि आपल्याच पैशाचे हार आणून, आपल्याच गळ्यात घालून घेतात.
तरी देखील त्यांना कुणी साधा नगरसेवक देखील म्हणत नाहींत. राजू खरे यांना मात्र, लोकच आता भावी आमदार म्हणून ओळखत आहेत. अर्थात राजू खरे हे राजकारणात आहेतच... त्यांची मोठी महत्वाकांक्षाही आहे. पण आश्वासनांची खैरात करणारे हे नेते नाहीत, ते घेणारे नाहीत तर देणारे आहेत, हेच मोहोळ तालुका पहात आला आहे. साहजिकच याचे उतराई होण्याची जबाबदारी, आता जनतेवर येवून पडली आहे. आजच्या काळात कुठे भेटतो असा माणूस ? माणूसपण जपणारा माणूस ! राजकारणात खोटं बोल पण रेटून बोल, मागच्याला विसर, पुढच्याच वाजव ढोल" अशी माणसं पावलापावलावर भेटतात.
कुणी काही अडचण सांगितली की "होय" तर म्हणायचं पण करायचं काहीच नाही. अशा गर्दीत राजू खरे वेगळे असल्याचे आधीच सिद्ध झाले आहे. आता पुन्हा एक घटना समोर आली आहे. मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि जेष्ठ नेते मानाजीराव माने, त्यांची शाळा मोडकळीला आली होती, शाळेची डागडुजी व्हावी म्हणून त्यांनी आजवर प्रत्येक आमदारांचे उंबरे झिजवले. सगळे होय म्हणाले पण केले कुणीच काही नाही, विद्यमान आमदार देखील होयबा झाले पण बोलाण्यापुरतेच ! राजू खरे तर आज आमदारही नाहीत. त्यांनी तब्बल अकरा लाखांची मदत या शाळेला केली. विश्वास न बसावा असे हे सारे पण, सगळेच सत्य आहे. एका कार्यक्रमासाठी म्हणून राजू खरे या शाळेत गेले आणि शाळेची अवस्था पाहून त्यांचे मन हेलावले. त्याच क्षणी त्यांनी शब्द दिला आणि गेल्याच महिन्यात तब्बल अकरा लाखाचा निधी त्यांनी मिळवून दिला. याचे कौतुक होतेय तो पर्यंतच आता खरे यांनी पुन्हा दहा लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या हाती ठेवला.
गोपाळपूर येथील फार्म हाऊसवर उद्योजक राजू खरे आणि त्यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांच्या हस्ते वरील धनादेश दिला आहे. राजकीय व्यक्ती देखील दाता असू शकतो हेच खरे यांनी पुन्हा दाखवून दिले आहे,या दानशूर आणि राजकारणात राहून माणूसपण जपात असलेल्या राजू खरे यांना आम्ही विचारले तेंव्हा काय म्हणाले पहा.