पंढरपूर प्रतिनिधी
रुक्मिणी विद्यापीठ संचलित सर्व विभागांच्या वतीने ३९४वी शिवजयंती मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची संस्थापक सचिवा मा सौ सुनेत्राताई पवार व संचालक श्री सुनंजय पवार यांचे शुभहस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर बोलताना सौ.सुनेत्राताई पवार म्हणाल्या की छत्रपतींचे आचार, विचार व निष्ठा यांचा जीवनात सर्वांनी वापर करावा शिवरायांनी अतिशय कमी वयात आपली जबाबदारी समजून स्वराज्यासाठी कार्य केले. तर शिवरायांनी मुठभर मावळ्यांच्या जोरावर आपल्या पराक्रमाने ,शौर्याने व धाडसाने या महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला. सर्व सामान्यासाठी कार्य करणाऱ्या या शेतकरी राजाला तानाजी मालुसरे ,बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद ,मुरारजी ,येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देतानाही मागे पुढे पाहिले नाही असे सांगून अशा या गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असुन जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचा संघर्ष ,इतरांविषयी असणारे प्रेम व महिला विषयीचा आदर आजच्या युगात सर्वांनी वाचण्याचा व त्यावर अंमल करण्याचे आवाहन या दिनी सर्वांना केले
तर यावेळी अक्षरनंदन प्राथमिकच्या राजनंदिनी पवार, धनश्री माने, आरती माने यांनीही छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर सुंदर असे व्याख्यान देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
तसेच मातोश्री ईश्वराम्मा ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावी मार्च २०२४ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना शिवमय शुभेच्छा देऊन श्री सुनंजय पवार अध्यक्ष युवक काँग्रेस आय सोलापूर यांचे शुभ हस्ते परीक्षार्थींना पेपर लिखाणासाठी पॅड भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ नंदिनी गायकवाड ,मुख्याध्यापक श्री संतोष कवडे, श्री काशिनाथ गोगाव यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री आलनदीप टापरे यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार श्री गणेश डुबल यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेच्या सांस्कृतिक समितीने परिश्रम घेतले.