सोलापूर प्रतिनिधी
नगर जिल्ह्यातील राहुरी मधील ॲड मनिषा आढाव व ॲड.राजाराम आढाव या वकील दांपत्याच्या हात्येच्या घटनेने संपूर्ण वकिलांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. सोलापूर वकिल संघाने देखील सोमवारी 29 जानेवारीला न्यायालयाचे कामकाजापासून आलिप्त राहून तर मंगळवारी दि. 30 जानेवारी 2024 रोजी लाल फीत लावून कामकाज करीत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
त्यानंतर आज बुधवारी 31जानेवारी ला मा..जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन बार चे अध्यक्ष ॲड सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दिले.
या निवेदनात वकिलावर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. याला आळा घालण्यासाठी नविन कडक कायदे होणे आवश्यक आहे. वकिलांच्या संरक्षणार्थ देखील Advocate Protection Act हा नवा कायदा तातडीने अस्तित्वात आणावा अशी मागणी केली आहे.
यावेळी वकील संघाचे पदाधिकारी उपाध्यक्ष असिम बांगी, सचिव करण भोसले, सहसचिव अनिता रणशृंगारे, जेष्ठ वकिल व्ही. एस. उजळंबे, शरद पाटील, प्रसाद काशीद, अविनाश कडलासकर, मंगेश श्री खंडे, वैजयंती काशीद, अश्विनी क्षीरसागर .. प्रियंका सोलंकर ,.. सादिक इनामदार, मुफ्कताम. जहागिरदार, वासिम शेख, मळसिद्ध देशमुख, मंगेश खंडागळे आदि उपस्थित होते .