सोलापूर प्रतिनिधी
विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचे बोरन्हांन, तिळगुळ व हळदीकुंकूवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा पार पडला. १५० मातापालक हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमात रमून गेल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार होत्या.पालकांनी अंगणवाडीच्या मुलांना चुरमुरे,गाजर,ऊस,ढाळे, चॉकलेट, बिस्कीट, तिळगुळ घालून बोरन्हांन घातले. सुहासिनीसह विधवा महिला पालकांना सुद्धा हळदीकुंकूवाचा मान देण्यात आले. त्यानंतर मातापालकांचे हळदीकुंकू ओटी भरुन वाण म्हणून डबा देऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला.
यावेळी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार म्हणाले, आधुनिक युगातही रुढी,पारंपरिक पद्धतीने आलेल्या सणांना खूप महत्त्व आहे.भारतात मकर संक्रांतीच्यानिमित्ताने तिळगुळ व हळदीकुंकूवाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या विचारांचे देवाणघेवाण होते.मातापालकांनी एकमेकींच्या सुखदुःखात सहभाग घेतला पाहिजे.एकमेकींच्या अडिअडचणी दूर करण्यासाठी आधार देणे काळाची गरज आहे. महिलांनी आपल्या क्षेत्रात प्रामाणिक कार्य करावे.आपल्या कुटुंबांची जबाबदारी सांभाळून पाल्यांना चांगले शिक्षण देण्याचे आवाहन यानिमित्ताने केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भौरम्मा रेके यांनी केले तर आशाराणी गायकवाड यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शारदा गिनानी, वंदना तेली,अमृता बोगा, सुजाता फुलारी,वैशाली गुजर,शीतल चमके,उज्वला भांड, संगीता नरगिडे,रीना देवकर, मंगल स्वामी आदींनी परिश्रम घेतले.