सोलापूर प्रतिनिधी
लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य ही लोकशाहीची व्याख्या आज संपुष्टात आली, सत्ता पैसा प्रतिष्ठा याच्या हव्यासापोटी सत्ताधाऱ्यांकडून आज लोकशाहीचा खून झाला, काल जेव्हा न्यायाधीश आरोपींना भेटायला गेले तेव्हाच निकाल कळला होता.
पण लक्षात ठेवा या निकालाने जनता जागी झाली आहे, लोकशाही टिकवायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवाय पर्याय नाही हे जनतेने ओळखले आहे , त्यामुळे उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे हे देशातील नंबर वन नेता होतील, आम्ही जनतेच्या न्यायालयात न्याय मागू आणि जनता तुमचा योग्य निकाल ल़ावेल जनतेच्या दरबारात आम्हाला नक्की न्याय मिळेल-
अस्मिता सुरेश गायकवाड, उपनेता, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष