म्हसवड प्रतिनिधी सचिन सरतापे
छत्रपतींची राजधानी असलेल्या व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची कर्मभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेत प्रवेश घेतला. त्या सातारा जिल्ह्याच्या भूमीत चळवळीला योगदान देणाऱ्या दलित पॅंथर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त सत्कार सोहळा आज आयोजित केला आहे.
रविवार दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत सुटा कार्यालय, ३, केसरकर पेठ, पहिला माळा, हॉटेल मानस समोर, सातारा नगरपालिका शेजारी हा ऐतिहासिक सोहळा होत असल्याची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष अमर गायकवाड यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील शोषित, पीडित, वंचित, दलित, अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्यासाठी कोणती आशा अपेक्षा व पदाची फिकीर न करता १९८० व ९० च्या दशकात अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. चळवळीने बाळसं धरले असले तरी अनेकांचे आयुष्य उध्वस्त झालेले आहे. पण, कोणत्याही चळवळीमध्ये त्याग केल्याशिवाय इतरांना यश मिळत नाही. परंतु, समाज मनामध्ये त्यांची प्रतिमा इतिहासाच्या माध्यमातून कायमची कोरली गेलेली आहे. अशा आंबेडकरी चळवळीतील पँथर्स यांचा सन्मान करावा.
या दृष्टीने दलित पॅंथर व क्रांती थिएटर्सच्या वतीने हा आगळावेगळा कार्यक्रम होत आहे. सदर कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे दलित पॅंथर संस्थापक- अध्यक्ष अंबादास शिंदे, एल.आय.सी. पुणे व्यवस्थापक अजय कांबळे, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुरेश थोरात, अजित जगताप, जिल्हा परिषद माजी सभापती बाळासाहेब शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच अरविंद गाडे ,अशोक भोसले, शेखर मोरे, शंकर जाधव, मधुकर आठवले, सतीश गायकवाड, विष्णुपंत शिंदे, धनाजी वाघमारे, कृष्णा गव्हाळे, सिद्धार्थ कांबळे, बाळासाहेब खरात, संजय बडेकर, रियाज बागवान, कुंदन तडाखे, दत्ता साठे व मान्यवर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. ज्यावेळी पॅंथर संघटनेला कार्यकर्त्यांची गरज होती. त्यावेळेला अनेकांनी या संघटनेत खूप मोठे योगदान दिलेले आहे.
आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक परिस्थिती बदलली असली तरी जो इतिहास घडवतो. त्याचा कधीही समाजाला विसर पडत नाही. याच भावनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्यांना दलित पॅंथर बद्दल आपुलकी व अभिमान आहे. अशा समाजातील सर्व घटकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असेही आवाहन सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष अमर गायकवाड, मधुकर आठवले व अरविंद गाडे यांनी केले आहे.