म्हसवड/सातारा प्रतिनिधी सचिन सरतापे
देशात आणि राज्यातील जनता महागाई,बेरोजगारी,ने त्रस्त आहेत.व्यापारी,छोटे उद्योगपती नाराज असताना शेतकरी सरकार च्या शेतीविरोधी धोरणावर नाराज आहेत.देशात आणि राज्यात जातीय धार्मिक दंगली घडत आहेत त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील लोक या सरकार वर नाराज आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विरोधी वातावरण असताना परत परत त्यांची च सत्ता येते आहे असे मत किरण सावंत यांनी बोलताना व्यक्त केले आहे
काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सुद्धा EVM मशीन मध्ये घोटाळा होऊ शकतो असे मत नोंदवले आहे त्याविषयीं सुप्रीम कोर्टात याचीका दाखल आहेत आता लोकांच्या आणि विरोधी पक्षाच्या लोकांच्या मनात EVM मशीन वर शंका येऊ लागली आहे.आणि त्यातच सर्वत्र वातावरण सरकार विरोधी असताना निवडणूक आयोगाने EVM विषयी जनजागृती करण्यात मग्न आहे.सर्व जिल्हाधिकारी, प्राणतंधिकारी,तहसीलदार यांना सक्तीने EVM मशीन ची जनजागृती करण्यास लावले आहे आणि त्याठीकाणी फक्त लोकांच्या श्याम घेतल्या जातात अभिप्राय रजिस्टर ठेवले नाही जेणे करून लोकांना आपले मत निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवता यावे.
निवडणूक ही बॅलेट पेपर वर व्हावी असे आता जवळ जवळ सर्व जनतेचे आणि विरोधी पक्षाचे मत झाले असताना केंद्रीय निवडणूक आयोग का EVM मशीन ची जनजागृती करत आहे हा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो आहे.आमची सरकार ला आणि निवडणूक आयोगास विनंती आहे की आपण लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी EVM मशीन बंद करून बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यावी अन्यथा जनतेच्या रोषास सामोर जावं लागेल.