मंगळवार दि.१२ डिसेंबर पासुन आदिवासी आयुक्तालयासमोर बिर्हाडासह ठिय्या आंदोलन
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पात्र लाभार्थी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनें
मंगळवार दि.१२ डिसेंबर पासून आदिवासी आयुक्तालय प्रांगणात वंचित लाभार्थी सह बिर्हाडासह ठिय्या आंदोलन करणार असल्याचा खणखणीत इशारा एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी दिला आहे.
प्रसारमाध्यमानां याबाबत सविस्तर माहिती देतानां भगवान मधे यांनी सांगितले कि दि. ७ जून 2023 रोजी आदिवासी विकास मंत्री यांच्या निवास्थानी मुंबई येथे पायी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन केले होते.
त्याची दखल घेत मोर्चा काढण्यात येऊ नये , आपण चर्चतून मार्ग काढू असे शासनाने आम्हाला आश्वासन दिले होते. आणि आदिवासी विकास मंत्री यांच्या कार्यालयातून तसे लेखी कळवले गेले होते.
चर्चा करण्यासाठी दिनांक 13 जून 2023 हि तारीख दिली
ना,डॉ विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी नाशिक यांचेसह जिल्ह्यातील सर्व गटविकास आधिकारी सहभागी झालेले होते.
शबरी घरकुल योजनेसाठी आलेले सर्व पार प्रस्ताव स्वीकारून त्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ द्यावा असे निर्देश देण्यात आले होते त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील पात्र लाभार्थी यांनी स्वतः पंचायत समिती मार्फत शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून 7 महिन्यापूर्वी अर्ज दाखल केले आहेत
त्रंबक, इगतपुरी,पेठ नाशिक, निफाड, पंचायत समितीमध्ये अर्ज सादर केले वरील तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केले मात्र अद्यापही पंचायत समितीकडून सदर प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी जिल्हा विकास यंत्रणा व आदिवासी विकास विभाग यांच्याकडे सदर अर्ज पाठवले नाहीत त्यामुळे वरील तालुक्यातील आदिवासी भूमी. विधवा महिला, यांना सदर घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहेत
पंचायत समितीमध्ये दाखल झालेल्या सर्व घरकुल योजनेचे प्रस्ताव मंजुरीसाठी आदिवासी विभाग यांच्याकडे तात्काळ पाठवण्यात आले मात्र अद्यापही अनेक पात्र लाभार्थीना असून त्यांच्या कडे जातीचे प्रमाणपत्र नाही यासाठी तात्काळ या सर्व लाभार्थीना जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून मोहीम आखली जावी असे पत्र देखील आपण तहसीलदार याना दिले मात्र अजूनही काहीही केलेलं गेले नाही.आदिवासी जमातीचे पात्र लाभार्थी असून जातीचां दाखल्या अभावी देखील त्यांचे प्रस्ताव पाठवले जात नाही अशी बाब निदर्शनात आली आहे संबंधित दाखला नसलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी देखील संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना देऊन त्यांना तात्काळ जातीचे दाखले देऊन लाभ मिळावा अशी मागणी केली आहे मात्र त्यावर अद्याप पर्यंत कोणत्या प्रकारची कार्यवाही केली गेली नाही त्यामुळे केवळ जातीचा दाखला नाही म्हणून पात्र लाभार्थीला वंचित राहण्याची वेळ आली आहे.
समितीकडे सादर झालेल्या सर्व पात्र लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुक्काम ठोकणार असा इशारा देण्यात आला आहे .