ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर
- साल २०२४ उजडायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत.नव्या वर्षात लोकसभा निवडणुकीचा हल्ला गुल्ला जोर शोर से वाजायला सुरुवात झाली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारानीं मोर्चेबांधणी व जनसंपर्क सुरु केला असुन, सोशल मिडीयावर इच्छुक नेते व त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक होत प्रचारतंत्रात मग्न झाल्याचे चित्र दिसून येते आहे.
महाराष्ट्रात कधी नव्हे एवढया अनपेक्षित राजकीय उलाढाली होऊन एक प्रकारचे त्रांगडे निर्माण झाले आहे.यातुनच महायुती व महाविकास आघाडी उदयास आली आहे.या दोन्ही आघाडयाकडुन एकास एक उमेदवार देण्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी इच्छुकाचीं भाऊगर्दी पाहता हे शक्य होईल का ? असा सवाल जाणकार करत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघ हा महायुतीत शिवसेनेच्या वाटयाला जाण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेचे विदयमान खासदार हेंमत गोडसे हे करत आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार दुसर्यादां निवडुन येत नाही हा समज खोटा ठरवत गोडसे यांनी दोनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले असुन, या वेळीही आपणच असा दावा करत ते हॅटट्रिक करण्याच्या इरादयानेच सध्यातरी मैदानात उतरल्याचे चित्र दिसून येते आहे. या मतदार संघावर मराठा समाजाचे निर्णायक वर्चस्व असुन गोडसेचां बराच गोतावळाही पसरलेला आहे.यामुळे तिसर्यादांही आपण येथे बाजी मारु असा आत्मविश्वास गोडसे व गोडसे समर्थक व्यक्त करत आहे.
गोडसे हे वार्याची दिशा अचुक ओळखणारे चाणाक्ष राजकारणी आहेत.आणि भुजबळासारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्यावर मात करुन दोनदा त्यांनी विजयश्री खेचुन आणली आहे. यामुळे जनमाणसाची नाडी अचुक ओळखण्यात ते पारंगत झाले आहेत.मराठा कार्ड ही त्यांची मजबुत बाजु आहे. या शिवाय शिवसेना, भाजप सोबत च अजित पवार गट राष्ट्रवादी ही आता सोबत आल्याने गोडसेचें हौसले बुलंद झाले आहेत.
अर्थात गोडसे व भुजबळ हयांचे सुपरिचीत राजकीय हाडवैर दोघेही आता महायुतीत असल्याने संपुष्टात येईल का ? भुजबळ मनापासून गोडसेनां साथ देतील का ? अति परिचयात अवज्ञा या उक्ती प्रमाणे मतदारानां बदल हवा आहे कि ते पुन्हा तिसर्यादां गोडसेनां स्वीकारतील का ? असे काही प्रश्नही या निमित्ताने पुढे येत आहे. अर्थात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे कडवे समर्थक मानल्या जाणार्या गोडसेचीं उमेदवारी शिवसेनेकडुन जवळपास निश्चिंत मानली जाते आहे.
गोडसेनां विरोधकाकडुन आव्हान मिळेल ते मिळेल.पण तत्पुर्वीच भाजपाचे नगरसेवक तथा नाशिक चे दिग्गज व आक्रमक ओळख असणारे नेते दिनकर पाटिल यांचेच आव्हान उभे राहिल्याचे दिसत आहे.
युतीचा बालेकिल्ला असणार्या नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने नेमका दावा ठोकला आहे की दिनकर पाटिल हे आक्रमक होत ही जागा जागावाटपात भाजपकडे यावी यासाठी वरीष्ठ पातळीवर हालचाली करत आहे कि भाजपा श्रेष्ठीनींच पाटलानां आशिर्वाद देऊन आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत या बाबत खमंग चर्चा रंगते आहे.
दिनकर पाटलाच्यां झंझावाती निवडणुक पुर्व प्रचाराने गोडसेही काहीसे साशंक झालेले आहेत. कदाचित जागा वाटपात काहीही होऊ शकते यामुळे धाकधुक वाढलेली आहे.मात्र कदाचित असे झालेच तर भाजप सेनेत मात्र अंतर्गत कलह माजण्याची साधार भिती व्यक्त करत विरोधकानां याचा फायदा होण्याचा दावा केला जातो आहे. त्या मुळे गत वेळे प्रमाणेच याही वेळेस दिनकर पाटलाचें खासदारकीचे स्वप्न भंगेल की पुर्ण होईल अशी चर्चा सुरु आहे.
या शिवाय अजित पवार राष्ट्रवादी गटाकडुन सिन्नर चे आमदार माणिकराव कोकाटे यांचेही नाव जोरदार चर्चेत आहे.
गोडसे,पाटिल व कोकाटे हे गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत परस्परविरोधी लढलेले आहेत.दिनकर पाटिल हे बसपा कडुन तर माणिकराव हे अपक्ष म्हणुन रिंगणात होते.या सगळयामागे भुजबळ यांचीच खेळी होती अशी तत्कालीन काळात चर्चा झडत होती.
गंमत म्हंणजे यावेळी हे तिन्हीही नेते, अगदी भुजबळ यांचेसकट महायुतीत च असल्याने यांचे मिले सुर, मेरा तुम्हारा प्रमाणे सुर जुळतील का ? कि पडद्याआड तंगडीखेच राजकारणच सुरु राहिल याचीही चर्चा आहे.