सिताराम साखर कारखान्याचे एका दिवसातील उच्यांकी गाळप ३९६० मे. टन २०२३-२४ हंगामामध्ये ६/१२/२०२३ अखेर १,००,००० मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण गाळप हंगाम २०२३-२४ मधील नोहेंबर अखेरचे तोडणी वाहतुक बिल कमिशन सह वाहन मालकाच्या बैंक खात्यात वर्ग
खर्डी प्रतिनिधी अमोल कुलकर्णी
खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असुन या हंगामात १० दिवसाच्या मस्टरमधील गाळप झालेल्या ऊसाला प्रती टन २७००/- रु प्रमाणे पहीला हप्ता देण्यात येत आहे. २०००/- रु. प्रती टन याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतक-याच्या बैंक खात्यात वर्ग करण्यात येत आहे अशी माहीती कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड यांनी दिली
या हंगामामध्ये ६/१२/२०२३ अखेर १,००,००० मे. टन ऊसाचे गाळप करुन पांढ-या शुभ्र दाणेदार प्रतीच्या साखरेचे उत्पादन केलेले आहे. कारखान्याचे मुख्य प्रर्वतक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या कुशल मार्गदश्र्नाखाली कारखान्याच्या ऊस गाळपाची घोडदौड जोमाने सुरु आहे.
साखर कारखान्याच्या गाळ्प हंगाम २०२३-२४ मधील नोहेंबर अखेरचे तोडणी वाहतुक बिल कमिशन सह वाहन मालकाच्या बैंक खाती वर्ग करणेत आलेले आहे. तसेच सध्या कारखाना पुर्ण क्षमतेने चालु असुन दि. ७/१२/२०२३ रोजी एका दिवसात ३९६० मेटन ऊस गाळप करुन विक्रम नोंदविला त्या निमीत्ताने सर्व कर्मचारी यांचा सन्मान मा. प्रा. शिवाजीराव काळुंगे (सर) याचे हस्ते करन्यात आला. प्रतीदिन ३५०० मेटन क्षमतेने ऊसाचे गाळप करणेत येत आहे .
तरी अशाच प्रकारे गाळप कर्मचारी बांधवानी करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड यांनी केले. तसेच ऊस बिलाचा हप्ता दर दहा दिवसांनी अदा करणेची परंपरा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याच्या संचालिका अॅड. दिपाली पाटील व स्नेहल मुदगल यांनी कर्मचारी वंदाचे कौतुक केले.