नेते व्हीआयपी यांची वारी विठ्ठलाच्या दारी,
सर्कल ,तलाठी सामान्यांना वेठीस घरी.
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक नेते व्हीआयपी येतात आषाढी यात्रेला तर भक्तांच्या बरोबर व्हीआयपी ची पण वारी असते हे सर्वजण विश्रामगृह अर्थात रेस्ट हाऊस या ठिकाणी मुक्कामी असतात या सर्वांची सर्व काही करण्यासाठी महसूल खाते अर्थात तहसील कार्यालय यांच्यावर अप्रत्यक्ष जबाबदारी टाकली जाते हे काम पार पाडण्यासाठी सर्कल तलाठी यांच्यावर जबाबदारी टाकली जाते.
ते रोज नको म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नागरिकांना खातेदारांना सामान्यांना भेटीला धरले जाते त्यामुळेच छेदाने म्हणावे लागेल नेते व्हीआयपी यांची वारी विठ्ठलाच्या दारी झालेला खर्च वसूल करण्यासाठी सर्कल तलाठी वेठीला धरी. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने दर्शनासाठी अनेकांचा प्राप्त असतो आलेले व्हीआयपी वेळप्रसंगी येथील विश्रामगृहावर मुक्काम करतात या व्हीआयपी नेतेमंडळीची सरबराई करण्याची जबाबदारी तलाठी सर्कल यांचेवर अप्रत्यक्ष पडली जाते या आलेल्या व्यक्तींचा सर्व खर्च एका दिवसाचा दहा ते बारा हजार रुपये होतो.
अशी या परिसरात दबक्या आवाजात चर्चा असून नुकतीच आषाढी यात्रा संपल्याने येथील आलेल्या सर्वांची व विश्रामगृहावर व अन्य ठिकाणी उतरलेल्या महत्त्वाच्या लोकांची सरबराई करण्यासाठी वरील दोघांना पार पाडावी लागते या वारीत मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने तो वसूल करण्यासाठी सर्कल तलाठी यांनी सामान्यांना भेटीला धरण्यास सुरुवात केली आहे शेतकरी सामान्य तसेच प्लॉट खरेदी धारक घर खरेदी धारक हे या मालमत्तेची नोंद करण्यासाठी या लोकांकडे गेल्यानंतर सर्व कागदपत्राची पूर्तता करून देखील काहीतरी कारण काढून संबंधिताच्या नोंदी भरण्यास काचकूच करून त्यांना आर्थिक फायद्यासाठी भेटीला धरण्याचे प्रकार घडल्याने घडत असल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.
काही सर्कल तलाठी उघडपणे खाजगीत नोंदणीसाठी आलेल्या व्यक्तीला म्हणतात एवढी रक्कम द्या तर नोंदप्रमाणेच करतो का तर आम्हाला पदरमोड करून विश्रामगृहावरील आलेल्या सर्वांचा खर्च भागवावा लागतो तो आम्ही कोठून वसूल करायचा असे सांगून कामासाठी आलेल्या व्यक्तीला भेटीला धरले जाते वास्तविक पाहता सर्व कागदपत्राचे पूर्तता करून नोंदी करण्यासाठी कागदपत्रे दिल्यानंतर नियमाप्रमाणे 21 दिवसात या नोंदी प्रमाणित केल्या जातात परंतु काहींच्या नोंदी दोन महिने झाले तरी केवळ कायदा कागदावर ठेवून काय द्यायचे याचीच भाषा केली गेल्याने अनेकांना वेळेत कागदपत्र न दिल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे याकरता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून अशा उद्धटपणे सामान्यांना बोलून वेटीस धरणावर कारवाई करावी अशी चर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात व ज्या ठिकाणी सर्कल तलाठी यांचा सतत राबता असतो त्या रायगड भवन परिसरातही चालू आहे.
कामासाठी आलेले लोक स्वखुशीने काही ठराविक रक्कम देण्यासाठी तयार असतात कारण त्यांना नोंदी प्रमाणित केलेले उतारे व 7.12 उतारे कामासाठी बँक प्रकरणासाठी.इतर महत्त्वाच्या कामासाठी वरील कागदपत्रे गरजेचे असते याचाच गैरफायदा हे सर्कल तलाठी घेऊन येणाऱ्या सामान्य लोकांना त्रास देतात याकरता आता जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या सर्वांना कायद्याचा भाग दाखवून आशीर्वाद देण्याची नितांत गरज आहे अशी सर्वसामान्यांची धारणा झाली आहे सध्या पंढरीत महसूल खात्यात कोणत्याही कामासाठी कागदावर आर्थिक रुपी वजन ठेवल्याशिवाय कागदच हलत नाही याकरता काही ठराविक खाजगी व्यक्तींसाठी राबता या कामासाठी कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे असा प्रश्न या सर्वांना पडला आहे तरी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तलाठी सर्कल यांच्या मनमानी कारभाराला आळा घालून सामान्य ना दिलासा द्यावा असे कामासाठी येणाऱ्या नागरिक ,खातेदारांना वाटत आहे.