मानपत्र आणि रोख ५००००/-पुरस्काराचे ज्ञानेश्वर दुधाणे मानकरी
सोलापूर प्रतिनिधी शिवाजी कांबळे
छाया-प्रकाश फाऊंडेशन सोलापूर यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दिला जाणारा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी)शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांना राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शुभहस्ते दिग्दर्शक निर्माता नागराज मंजुळे,राजू परुळेकर, भगवान रामपुरे,आयोजक स्वाती शहा, अजित शहा, प्रेरणा गांधी,मालविका शहा- सेन, पुष्पा आगरकर मॅडम, यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी)ही शाळा.या शाळेत ज्ञानेश्वर दुधाणे आणि किरण ढोबळे रुजू झाल्यानंतर आल्या आल्या जवळपास २१०००/-रुपयांची झाडे लावून शाळा हिरवीगार करायला सुरुवात केली.त्यानंतर अधिक सुविधा निर्माण करण्यासाठी वाफळकरवस्ती ग्रामस्थांच्या सहकार्याने जवळपास ४ लाखांचा लोकसहभागातून शाळेच्या सुविधा पूर्ण केल्या त्यामध्ये वॉटर फिल्टर, प्रज्ञा चक्षु वाचनालय, डिजिटल वर्गखोली,अद्यावत खेळाचे मैदान,आणि बार्डी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कंपाऊंड, वर्गखोली,आणि शाळा दुरुस्ती साठी मिळून जवळपास चौदा लाख रुपये खर्च करून शाळेचे रुप पालटले.या शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यामध्ये आई वडिलांचा पूजन सोहळा अविस्मरणीय ठरला, क्षेत्रभेट, व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षा, प्रत्येक वर्षी बाजार डे चे यशस्वी आयोजन, अशा विविध उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल सलग दोन वर्षे वाफळकरवस्ती शाळेला स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या संकल्पनेतून आणि सक्रिय सहभागातून करकंब लेकीच झाड अभियानाच्या वतीने ६०० झाडांचे संवर्धन करणे,जागर टीमच्या माध्यमातून दर रविवारी स्वच्छता करणे, नादब्रह्म कला फाउंडेशन आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी ख्यातनाम कलाकारांच्या उपस्थितीत संगीत महोत्सवाचे आयोजन, आणि ख्यातनाम गायक गायिका यांना पखवाजसाथ करत असतानाच एकलव्य अभ्यासिकेची स्थापना आणि त्याला मिळालेला विद्यार्थ्यांंचा प्रतिसाद आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करीत असताना या कार्याची दखल घेत हा सन्मान छाया प्रकाश फाऊंडेशनच्या माध्यमातून सन्मानपत्र आणि रोख ५००००/- रुपये पुरस्कार मिळाला.
तसेच या पुरस्कार निवड समितीचे रजनीश जोशी, सुर्यकांत बनकर यांचेही धन्यवाद आयोजकांच्या वतीने मानले जेणेकरून समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांना पारखून घेऊन पुरस्काराची उंची वाढवण्यासाठी मोलाचं सहकार्य केले.तसेच हा पुरस्कार जीवनातील एक मोठी जबाबदारी असून सर्वच क्षेत्रात काम करायला प्रेरणादायी ठरला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव काम करत पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवाय करकंब मधील शिक्षक शिक्षिका,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.पत्नी देवकीची अनमोल साथ असल्याने काम करण्यासाठी बळ मिळत आहे.यावेळी अनेकांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती शहा यांनी केले.सुत्रसंचलन रजनीश जोशी यांनी केले.