पंढरपूरातील ख्यातनाम महिला प्रवचनकार , रामायणाच्या निरुपणकार , सा.पंढरी प्रसादच्या संपादिका , सजग लेखिका , 'नारी तू नारायणी ' व नारद भक्ती सुत्र यांच्या लेखिका , प्रभावी वक्त्या, आशा नाना विविध गुणांचे महिला व्यक्तीमत्व मानसी ताई केसकर यांचे निधन म्हणजे समस्त माहिला वर्गाचेच नव्हे तर पंढरीतील एक धार्मिक ज्ञानपीठच हरपले ...... ! अंत्यत दुःखद !
मानसीताईनी सुरुवातीच्या अंत्यत खडतर जीवन प्रवासात आपली लेखणी सजग ठेवली . मुद्रण व्यवसाय नेटाने चालविला.
'पंढरी प्रसाद ' सारखे साप्ताहिक चालवून त्यांनी संस्कार , समाज, धार्मिकता यामध्ये प्रबोधन केले .
त्यांचे लिखाण अतिशय सजग व भावनाप्रधान असे असायचे यातून काही तरी बोध घ्यावा यावर त्याचा कटाक्ष असायचा , त्यामुळे ते मनाला भावायचे ! 'त्यांच्या प्रातः स्मरणीय ' या मुक्तछंदातील काव्यांद्वारे मग ती पांडूरंगाला केलेली पहाटेची भक्ती रसात्मक भूपाळी सारखी आळवणी , निसर्गाचे वर्णन , धार्मिक , संसारिक रचना यातून त्यांनी भावनात्मक व वैचारिक प्रकटीकरण केले . या मुक्तछंदाच्या काव्यांमधून निसर्गाला साज घातली .
या शिवाय ' माझिया मना जरा बोल ना ! 'या स्तंभलेखातून त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देत चारित्र चित्रण केले . यात त्यांच्या मैत्रिणी ( सख्या ) आप्त , नातेवाईक यांच्या प्रती असणारा स्नेहप्रकट केला . त्याच्या ठाई असलेला ममत्वभाव , वात्सल्यभाव हा वाख्याण्याजोगा होता . हे त्यांच्या लिखाणातून जाणवत होते .
सद्गुरू गजानन महाराज ,समर्थ रामदास स्वामी यांच्या त्या ' निस्सीम भक्त होत्या . रामायण , ज्ञानेश्वरी यावर त्यांचे प्रभुत्व होते तर ''दासबोध '' हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य ग्रंथ होता . यातील समर्थ रामदास स्वामी व प्रभु राम हे त्यांच्या अखंड मध्यमेत व वैखरीतच होता . यांच्या अभ्यासावर त्यांनी अनेक प्रवचने , निरुपण केली. पंढरपूरच्या सांस्कृतिक , धार्मिक , वृत्तपत्र क्षेत्रात त्यांचे कार्य अमुल्य आहे .पंढरपूरच्या राष्ट्रसेविका समितीच्या वतिने आयोजित रामजन्म कथांमध्ये त्या किर्तन साजर करत असत... आतिशय अभ्यासपूर्ण , रसाळवाणीने त्या श्रोत्याना मंत्रमुग्ध करत असत . यामध्ये नवनविन अर्थ पूर्णशब्दांचा वापर . लयबध्दता ही त्यांची खासीयत होती .
अलिकडील काळात या सर्वांचा परिपाक म्हणून पुत्र मंदार ,स्नुषा मेत्रीय ताई , नातीचे यशदायी शिक्षण यांच्या यशाचा लख्ख प्रकाश चोहिकडे पसरला होता. सुनबाई डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्या होत्या , तर मंदार ने वक्तृत्व अँक्याडमी स्थापन करून त्यात यश संपादन केले होते . शिवाय दोन्ही नातींची शैक्षणिक यशाची कमान उंचावत होती . त्यामुळे त्यांच्या ज्ञानाने, कतृत्वाने काळ देखिल अचंबित झाला होता . या सर्वांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांच्या आयुष्याचे सोने झाले होते. मंदार , सून मैत्रियताई , नाती यांचा त्यांना फार हेवा वाटत होता.
मला आठवते माझ्या आईच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम मी आयोजित केला होता . त्यामध्ये त्या प्रमूख पाहूण्या होत्या तर कै . भागवताचार्य वा. ना उत्पात हे अध्यक्ष होते .त्या वेळी त्यांनी ' आई ' या विषयावर व्याख्यान दिले होते . तो क्षण आतिशय हृदय द्रावक असाच होता .
शिवाय मी , मंदार ,दुर्गेश सोनार यांना त्यांनी साहित्य क्षेत्रात नेहमीच मार्गदर्शन करत होत्या ! माझे बऱ्यापैकि लिखाण त्यावेळी . सा.पंढरीप्रसाद मध्ये त्या छापत असे ! यामुळे मला फार प्रोत्साहन मिळत असे .
ताईंबद्दल लिहावे ते थोडेच आहे . आठवणी भरपूर आहेत . मात्र हि प्रकाशमय 'पणती ' आता शांत झाली आहे ...... !
माझा सखा मंदार च्या जन्मदेला अर्थातच ' आईपणाला व्यापून उरलेल्या ' आईला .... मानसीताईंना माझा अखेरचा प्रणाम !
सश्रध्देय श्रध्दांजली !
भवदीय
श्री. अभिजीत तु .अवताडे
धर्मिक लेखक , अभ्यासक
,पंढरपूर