ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटिल यांचे तीव्र उपोषण सुरु असुन, या उपोषणाला महाराष्ट्र भर गावा-गावातुन सर्वत्र वाढता पाठिंबा मिळतो आहे.
या पाश्र्वभूमीवर ईगतपुरी तालुक्यातील रायांबे गावातही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
दरम्यान जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत रायांबे गावात कुठल्याही राजकिय नेते,पदाधिकारी यांना गावबंदी करण्यात आल्याचा इशारा युवा नेते अनिल भोर यांचेसह रायांबेचे चेअरमन गजीराम धांडे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ रायांबे येथे लाक्षणिक उपोषण ही सुरु असुन या उपोषणाला तब्बल पाच दिवस झाले आहे.
-------------
आरक्षणाची समाजाला तीव्र गरज- भोर
मराठा समाजाची आजची स्थिती दयनीय झाली असुन या समाजाला उन्नतीसाठी आरक्षणाची तीव्र गरज आहे.
जरांगे पाटलाच्यां मागणीला यामुळेच गावा गावात पाठिंबा मिळतो आहे.
-अनिल भोर
युवा नेते,रायांबे
-------------
आता आरक्षण घेणारच- चेअरमन धांडे
मराठा समाजाचे आंदोलन आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही.गावा गावात या आरक्षण मागणीसाठी आवाज तीव्र होतो आहे.
-गजीराम धांडे
चेअरमन रायांबे