स्वतःच्या सुखाचा त्याग करून जनतेच्या सेवेच व्रत म्हणजे स्पर्धा परीक्षेच खरं यश:-उमेश कुदळे
एकलव्य अभ्यासिकेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेस विद्यार्थी विद्यार्थिनींचा उदंड प्रतिसाद
करकंब प्रतिनिधी
"एकलव्य" अभ्यासिका करकंब "लेकीच झाड" टीम,"जागर स्वच्छता" टीम,यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रयत प्रबोधिनी चे संस्थापक उमेश कुदळे यांनी सांगितले.सुरुवातीला उमेश कुदळे सर, प्राचार्य किसन सलगर,राहुल हत्तरगे सर,करळे सर,माळी सर,अजीत पवार सर,स्वामी मॅडम, अध्यक्ष रघुनाथ जाधव उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे सहसचिव प्रमोद रेडे, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र वास्ते,सचिव पांडुरंग काटवटे, खजिनदार राजेंद्र करपे,संतोष भोसले सर, यांच्या शुभहस्ते विठूरायाच्या व चौंडेश्वरी मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.उमेश कुदळे सर मार्गदर्शन करताना पहिल्यांदा मी ग्रामीण भागात राहत असताना करिअर क्षेत्रात अनेक अडचणींवर मात करत मी कसा घडत गेलो. यावर सुंदर मार्गदर्शन करत एम,पी.एस.सी.सह विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अनेक क्लुप्त्या सांगत ग्रामीण भागात एकलव्य अभ्यासिका काम करतेय ही अतिशय गौरवास्पद बाब असून मनापासून शुभेच्छा देत ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परीक्षेचा बाऊ न करता आपली अभ्यास करण्याची मेहनत,जिद्द चिकाटी,त्याग,केला तर यश निश्चितच मिळू शकते, यासाठी रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी यांचा लाभ घेत यशस्वी झालेले आहेत,ग्रामीण भागात पाहता विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम असलेले दिसून येतात त्यांना अभ्यास करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते अभ्यास करीत असताना काय केलं पाहिजे.त्यामध्ये अपयशाचे खचून न जाता परत जोमाने अभ्यास सुरू ठेवला पाहिजे, इंग्रजी आणि व्याकरण विषयाचे सखोल ज्ञान, विज्ञान ,गणित,या विषयावर पाचवी पासून तयारी केली तर हे स्पर्धा परीक्षेच यश अतिशय सोप असल्याचे सांगितले,मुलाखती वेळेस आत्मविश्वास पूर्वक बोललं पाहिजे,यांचाही सराव करून आवश्यक आहे,यासाठी शासनाच्या अनियमितते मुळे ही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे.यावरही विचार करणं आवश्यक झालं आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना माध्यमिक शालेय वर्षांपासूननच करावी, यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचही अनमोल योगदान असायला पाहिजे असं आवर्जून सांगितले,एडव्हांन्स तांत्रिक संगणकाच्या युगात सर्वांनी ते आत्मसात केले पाहिजे, एकलव्य ने गुरु नसताना सुद्धा जे यश प्राप्त केले तसे सर्वांनी ध्यास घेतला पाहिजे,तसेच महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांची चरित्रे वाचली पाहिजेत,विद्या प्राप्त करताना परिस्थिती कधीही आड येत नाही त्यासाठी मनाची तयारी असली की अशक्य ते शक्य होतं.यावर अतिशय अनमोल मार्गदर्शन उमेश कुदळे सरांनी करत अनेक विद्यार्थी आणि पालक यांच्या शंकाच निरसन करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनाला एक नवीन संजीवनी दिल्याची भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर झळकत असताना दिसत होती, त्यासाठी रयत प्रबोधिनी चे निश्चितच कायम सहकार्य राहील असं अभिवचन दिले.तसेच एकलव्य अभ्यासिकेत सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत आपल्या अभ्यासाची आवड जोपासावी असे आवाहन एकलव्य अभ्यासिकेच्या वतीने सांगितले, यावेळी करकंब व करकंब पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
उमेश कुदळे सरांचा एकलव्य अभ्यासिकेच्या वतीने रघुनाथ जाधव साहेब यांनी सत्कार केला.एकलव्य अभ्यासिका ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सदैव पाठीशी राहील करकंब गाव हे अधिकाऱ्यांच गाव म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी अथक परिश्रम करावेत असे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रघुनाथ जाधव साहेब यांनी केले, सुत्रसंचलन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत आभार प्रा.प्रमोद रेडे पाटील यांनी मानले,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करकंब मधील सर्व प्रशालेचे शिक्षकांनी अनमोल सहकार्य करत एकलव्य अभ्यासिका, करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले.