ईगतपुरी तालुका प्रतिनिधी -नवनाथ गायकर
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संलग्न नागपुर व विदर्भ शाखेच्या संयुक्त वतीने २० वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन शनिवार दि.१४ आक्टोंबर रोजी एकदिवसाचे संपन्न होत आहे. या संमेलनात नाशिक शहर व जिल्हयातील तीन जेष्ठ साहित्यीकाचां महत्त्वपुर्ण समावेश करण्यात आला आहे. यामुळे विदर्भाच्या मातीत नाशिकचा डंका या निमित्ताने वाजणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे या साहित्य संमेलनाचे प्रमुख आयोजक आहेत.
या एकदिवसीय साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद उत्तर महाराष्ट्र विभागाचे प्रदेश अध्यक्ष तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक नवनाथ अर्जुन पाटिल गायकर , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे व जेष्ठ साहित्यिक माणिकराव गोडसे या तिघा दिग्गजाचां विविध सत्र,उपक्रम तथा कार्यक्रमात अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
सामान्य माणुस व त्या संबंधाने आजचे साहित्य या विषयावर नवनाथ गायकर यांचे परिसंवादात चिंतनात्मक विवेचन दु.१२ वा.आयोजीत परिसंवादात होणार आहे. तर भारतीय लोकशाही,काल,आज आणि उदया या विषयावर जेष्ठ साहित्यिक देविदास खडताळे यांचे चिंतनात्मक विवेचन होणार आहे.
नाशिक जिल्हयातील ख्यातनाम कवी माणिकराव गोडसे यांचा विशेष निमंत्रित मान्यवर कवी मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
नाशिक जिल्हयातील दिग्गज साहित्यीकाच्यां सहभागाबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य नाशिक शाखेचे वतीने अनेक मान्यवर साहित्यीकानी त्यांचे अभिनंदन केले आहे.