मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
एन सी सी आणि एन एस एस ची ओळख विद्यार्थ्याना शालेय व कॉलेज जीवनात होत असते व पुढे यातूनच देशाचे रक्षण करणारे जवान तयार होत असतात.यासाठी दरवर्षी विविध शिबिरांचे आयोजन राष्ट्रस्तरावर होत असतं. यंदाही नागपूर येथील कामठी येथे दिनांक २९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB) या अभियान अंतर्गत एन सी सी कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी संपूर्ण देशातून साधारण चारशे ते पाचशे मुलांची निवड करण्यात येते. या शिबिरात सैनिकी शिक्षणा बरोबरच आपापल्या राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गाणी सादर केली जातात, ज्यांची निवड होते त्यांना दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते.
यंदा मुंबई कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर शाळेतील शार्दुल ताम्हणकर, शर्विल रेडिज, विघ्नेश लाघवे यांची निवड झाली असून त्यांना आज नागपूर येथे रवाना करण्यासाठी शाळेतील एन सी सी प्रमुख ऑफिसर विश्वनाथ पांचाळ सर, मुलांचे पालक आदी मान्यवर मुंबई सी एस एम टी स्थानकात उपस्थित होते.