पंढरपूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी सात वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकार कडे वारंवार पत्रव्यवहार करत आहे गेली सात वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती वतीने
*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करत आहे राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यास पत्रकार सुरक्षा समिती कटीबद्ध असल्याची ग्वाही पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांना दिली आहे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार हे पंढरपूर येथे पत्रकारांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आले होते त्यावेळी बोलताना राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर समिती कटीबद्ध असून पत्रकारांचे प्रश्न सोडवले जातील याची ग्वाही दिली
पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे
राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अनेक अडचणीनां पत्रकारांना सामोरे जावे लागतं असून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे पंढरपूर शहर अध्यक्ष दत्ता पाटील उपाध्यक्ष रफिक अत्तार खजिनदार रामकृष्ण बिडकर बाहुबली जैन विनोद पोतदार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद उपस्थित होते.