या स्वच्छता मोहिमेअंतर्गत ४ टन कचरा गोळा करुन कचऱ्याची विल्हेवाट लावली
करकंब प्रतिनिधी
१ ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्री सदस्य जागर स्वच्छता अभियान टीम, ग्रामपंचायत करकंब युगंधर आखाडा टीम, स्वच्छता कर्मचारी, यांनी मिळून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आज बघता बघता करकंब गाव चकाचक करुन भारत सरकारच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे ,कोईनकर , गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी केलेल्या आवाहनाला सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिसाद देत सकाळी ६:००ते ११:०० या ५:०० तासात बसस्थानका पासून सुरु केलेल्या मोहिमेत जून्या पाण्याच्या टाकी खालील असलेला प्रचंड कचरा, म्हसोबा, आतार चौक,मंडई,बाजारतळ, धाकटी वेस मुलांची शाळा, जळोली चौक, शुक्रवार पेठ, मोडनिंब रोड,सरकारी दवाखाना येथील संपूर्ण भाग चकाचक करत करकंब गाव बघता बघता स्वच्छ केले.यासाठी गेली दोन वर्ष जागर स्वच्छता अभियान टीमच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सकाळी दोन तास एका भागाची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छतादुत सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उपस्थित असतात.
या अभियानामुळे आणखी प्रेरणा मिळाल्यामुळे भविष्यकाळात नक्कीच ही चळवळ प्रभावीपणे यशस्वी होणार अशी आशा वाटते, यावेळी करकंब ग्रामपंचायत ग्रामसेवक कर्मचारी यांनी ही सहभाग नोंदवून जागर टीमसाठी पाहिजे ते सहकार्य करण्याचं अभिवचन देऊन मार्गदर्शन केले.तसेच गावच्या स्वच्छतेबरोबर ग्रामस्थांच्या मनाचीही स्वच्छता तितकीच महत्त्वाची असून यासाठी सर्व ग्रामस्थांनी आपापला परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी करकंब गाव स्वच्छ आणि सुंदर दिसेल, यावेळी करकंब पोलीस स्टेशन घ्या वतीने स्वच्छता प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
अशीच जर सर्वांनी प्रत्येक रविवारी स्वच्छता करण्यासाठी साथ दिली तर निश्चितच महात्मा गांधी यांचा स्वच्छतेचा संदेश आणि खेड्याकडे चला हा संदेश आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली ठरेल. याकामी जवळजवळ १०० महिला आणि पुरुष सहभागी होऊन स्वच्छता मोहीम यशस्वी केली.या मोहिमेच करकंब ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.