'होऊ द्या चर्चा' अभियानातून योजनांचा भांडाफोड या कार्यक्रमात सिरोंचा तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत अमरावती गावातील गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केला तसेच गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश केदारी यांनी सिरोंचा क्षेत्रातील बेरोजगार युवकांना सुरजागड सारख्या लोह प्रकल्पामध्ये हाताला काम देण्याचे आव्हान केले
सिरोंचा (अमरावती) प्रतिनिधि
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने, गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा.श्री. महेश जी केदारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अहेरी विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. रियाज शेख यांच्या नेतृत्व होऊ द्या चर्चा अभियान कार्यक्रम दि. १ ऑक्टोंबर पासून सुरू झाला असून, दि. ०९ ऑक्टोंबर ला सिरोंचा तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत अमरावती गावात घेण्यात आले.
'होऊ द्या चर्चा' करूया बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड कार्यक्रमाची संचालनाची धुरा सिरोंचा तालुकाप्रमुख श्री दुर्गेशजी तोकला यांनी पार पाडली. प्रास्ताविक भाषण शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रियाज शेख यांनी केले. यामध्ये असे म्हटले आहे की, महागाईने सर्वसामान्य जनता होरपडून जात आहे. हाताला काम नसल्याने युवकांमध्ये नैराश्य पसरत आहे, खाजगीकरण व कंत्राटीकरणामुळे युवकांमध्ये प्रचंड संताप असून, 'होऊ द्या चर्चा' अभियानातून या संतापाला वाट मोकळी करून दिली जाणार आहे. असे सांगून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही, अशी आक्रमक भूमिका मांडली.
त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री महेश जी केदारी साहेब आपल्या मार्गदर्शनात भाजपचे सरकार जेव्हापासून केंद्रात आले आहे, तेव्हापासून ते पोत्याने योजना जनतेच्या माथ्यावर ओतत आहे. परंतु यातील किती योजना सुरू आहेत, यातील किती आश्वासने सरकारने पाळली आहेत? हे निव्वळ बोल घेवडे सरकार आहे. या सरकारच्या पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने होऊ द्या चर्चा या माध्यमातून जनतेसमोर जाऊन जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. रात्रीस खेळ चाले, असे भाजपचे सरकार आहे. १५ लाख रुपये जनतेच्या खात्यावर टाकणार होते, त्याचे काय झाले? उज्वला गॅस योजनेचे काय झाले? शिवछत्रपतींच्या स्मारकाचे काय झाले? महागाई पराकोटीला पोहोचलीय, बेरोजगारी वाढलीय. आता तर हे सरकारी शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात द्यायला निघालेय. यांच्या सत्ता काळात एका बाजूला उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ होतेय तर दुसऱ्या बाजूला रेशनला आधार जोड, आधारला मोबाईल जोड या खेळामध्ये जनता मात्र नागवली जात आहे. अशी टीका केली. तसेच अहेरी विधानसभेमध्ये सुरजगड सारख्या लोह प्रकल्पामध्ये स्थानिक बेरोजगार युवक युवतींना प्राधान्य द्यायला पाहिजे परंतु या प्रकल्पामध्ये परप्रांतीयांना घेतले जात आहेत. सिरोंचा क्षेत्रातील बेरोजगारांना प्रश्न विचारले असता तुमच्यापैकी किती लोकांच्या हाताला या प्रकल्पात काम मिळालेला आहे तर यामध्ये या क्षेत्रातील कुणालाही काम मिळालेला नाही असे लोकांनी गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख यांना सांगण्यात आले. त्यावर संपर्कप्रमुख महेश जी केदारी यांनी सिरोंचा क्षेत्रातील तसेच संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांना हाताला काम मिळवून देण्याचे काम फक्त आणि फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष करणार असे आव्हान करण्यात आले.
याप्रसंगी मनीष दुर्गे तालुकाप्रमुख एटापल्ली, अक्षय पुंगाटी युवासेना तालुकाप्रमुख एटापल्ली, या कार्यक्रमाचे आयोजक सिरोंचा तालुका प्रमुख रघुनंदन झाडी, शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व सर्व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.