ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संलग्न नाशिक शाखेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांचेकडे गायकर यांनी आपला हा राजीनामा दिला असुन, जबाबदारी तुन कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे.
सन २०११ मध्ये गायकर यांची गोरे यांनी ईगतपुरी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली होती. गायकर यांनी अल्पावधीतच ईगतपुरी तालुक्यात विविध साहित्यिक उपक्रम धडाक्याने राबवले.त्यांचा हा कामाचा वेग लक्षात घेऊन परिषदेचे अध्यक्ष गोरे यांनी गायकर यांना बढती देत २०१५ मध्ये त्यांचेवर नाशिक जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती.
२०१५ ते २०२३ पर्यंत गेली ९ वर्ष गायकर हे या पदावर कार्यरत आहेत.
या कालावधीत गायकर यांनी नाशिक जिल्हयात तब्बल ११ यशस्वी ग्रामीण साहित्य संमेलन भरवली आहेत.साहित्य परिषद दिवाळी अंक, साहित्य परिषद प्रकाशन संस्था आदिसह असंख्य उपक्रम राबवत साहित्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे.
दरम्यान गायकर यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांचे आभार मानले आहे. गोरे यांनी नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणुन काम करतानां आपल्याला नेहमीच स्वातंत्र दिले. त्यामुळेच आपण गेली ९ वर्ष मनमोकळे पणाने काम करु शकलो.आपल्या राजीनाम्याचे कारण विशद करतानां गायकर म्हणाले कि या पदावर आपण गेली ९ वर्ष काम करत आहोत. आता या पदावर नव्या दमाच्या साहित्यीकाला , कार्यकर्त्याला स्थान मिळणे गरजेचे आहे. म्हणुन आपण या पदाचा राजीनामा दिला आहे.
आपण यापुढे ही अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणुन कार्यरत राहु व वरिष्ठ पदाधिकारी भविष्यात देतील ती जबाबदारी स्वीकारु अशी ग्वाही गायकर यांनी दिली आहे.
गायकर परिषदेचे निष्ठावान शिलेदार- शरद गोरे
नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ गायकर हे परिषदेचे निष्ठावान शिलेदार असुन, त्यांच्या राजीनाम्यामागे इतरानां संधी देण्याची प्रामाणिक भावना आहे. या भावनेचा आदर निश्चिंत केला जाईल व गायकर यांचेकडे लवकरच वरिष्ठ पातळीवर जबाबदारी सोपवली जाईल अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी व्यक्त केली आहे.
गायकर यांचे कार्य भरीव-खडताळे
गेली ९ वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणुन गायकर यांनी साहित्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी शेकडो साहित्यीक, समाजसेवी व विविध क्षेत्रातील लोकानां प्रोत्साहित करत व्यासपीठ दिले आहे.
त्यांच्या या गुणाचां उपयोग आता वरिष्ठ पातळीवर केला जाईल अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे यांनी दिली आहे.
भाकरी फिरवली नाही तर करपते-गायकर
भाकरी फिरवली नाही तर ती करपते हा सामान्य न्याय आहे. आपण सलग ९ वर्ष या पदावर काम केले असुन आता नव्या दमाच्या साहित्यीकाला कार्यकर्त्याला स्थान देणे गरजेचे आहे. म्हणुनच आपण हा राजीनामा दिला आहे, असे गायकर यांनी यावेळी सांगितले.