पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील सुपली पाटी जवळ शेतीच्या वादातून पिकअप जीपद्वारे दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुग्रीव जाधव यांचा मृत्यू झाला असून, महेश जाधव यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पंढरपूर तालुक्यातील सुपली पाटी येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ,तुकाराम जाधव, सचिन लिंगडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी ज्ञानोबा नामदेव जाधव (वय ६८, रा. जैनवाडी, ता. पंढरपूर) यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संतोष ज्ञानोबा जाधव यांची जैनवाडी शिवारात शेती गट नंबर १२१, ११९, असा शेती गट असून, वाटणीबाबत भाऊ तुकाराम यांच्यासोबत वाद चालू आहे. फौजदारी खटल्याच्या तारखा चालू असून, ज्ञानोबा यांची मुले महेश व सुग्रीव जाधव हे (एम. एच. १३ ई. क्यू. ५८७५) दुचाकीवर पंढरपूर येथील न्यायालयातून आपल्या गावी जैनवाडी येथे परत जात होते.आपल्या दुचाकी वरून (एम. एच. १२ क्यू.डब्ल्यू. ८५९७) जाताना दिसल्याने अंकुश तुकाराम जाधव, संतोष तुकाराम जाधव, सचिन मनोहर लिंगडे (सर्व रा. जैनवाडी, ता. पंढरपूर) यांनी त्यांचा पाठलाग करून निर्जन ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीसह दोघांना १०० ते १५० मीटर फरफटत नेत गंभीर जखमी केले.
याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून संतोष जाधव, सचिन लिंगडे या दोघांना ताब्यात घेण्यात दरम्यान, पिकअप जीपमधून आले. यातील एकजण फरार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या नेतृत्वाखालील पथक तपास करीत आहे. दरम्यान, यातील मयत सुग्रीव जाधव यांच्या पार्थिवावर जैनवाडी येथील त्यांच्या शेतीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.