मराठी साहित्य संस्कृती कला विकास अंतर्गत प्रकाशित गावाकडची माती माती मधली नाती या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी माझी स्वरचित रचना -
शीर्षक - जगणं
माणूस म्हणून जगताना
कसं बरं लढायचं?
सर्वांशी मिळतं-जुळतं घेत
हसत-खेळत जगायचं
दूसऱ्यांना मदत करुन
जीवन सार्थक करायचं
नि:स्वार्थ बुद्धी बाळगून
जनसेवा करत राहायचं
अथक परिश्रम करून
खूप खूप शिकायचं
विद्येची उपासना करून
विद्यारुपी दान द्यायचं
सर्वांशी सद्गुणांनी वागून
माणूसकीचं दर्शन घडवायचं
आळस कुविचार झटकून
रोज जोमाने कामाला लागायचं
नवीन पिढी सुशिक्षित, सुसंस्कृत करून
भारत देशाला संपन्न समृद्ध करायचं
साहित्य संगीत आणि कलेवर प्रेम करून
जीवन सुंदर उज्ज्वल बनवायचं
संकटांशी विश्वासाने सामना करत
दु:खावर मात करत जगायचं
स्वतःबरोबर इतरांना आकार देऊन
सर्वांचंच जीवन घडवायचं
नवीन आशा-आकांक्षा जपताना
प्रेमानं दुसऱ्यांना सुखवायचं
कवयित्री - श्रीमती विद्या दत्तात्रय पवार
मु.पो.- नेरे, ता.-भोर, जिल्हा- पुणे
मो.नं -९३७२०२९७७१