डोंबिवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
नाते आपुलकीने,नाते विश्वासाचे आणि रक्षाबंधन हा सण भाऊ-बहीण यांच्या नातेसंबंधाचा सोहळाच.त्याच अनुषंगाने सुधाश्री या सामाजिक बांधिलकी जपणा-या संस्थेतर्फे तृतीय पंथयांसोबत रक्षाबंधन सोहळा साजरा केला.
समाजातील एक दुर्लक्षित घटक आणि आजही समाज त्यांना आपल्यात सामावून घेत नाही ही दुर्दैवी शोकांतिका आहे.ते ही आपल्या समाजातील एक भाग आहेत.याची जाणीव करुन देण्यासाठी सुधाश्री संस्थेच्या अध्यक्षा माधुरी जोशी यांनी आपल्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा हा उपक्रम हाती घेतला.यावेळी आलेल्या प्रत्येक तृतीय पंथी यांना पारंपरिक पद्धतीने दारात औक्षण करुन सन्मानाने आत आणण्यात आले.सौभाग्य वाण,मोग-याचा गजरा देण्यात आला. त्यानंतर सन्मानित तृतीय पंथी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.सुधाश्री संस्थेचे करंदीकर आणि परुळेकर यांनी तसेच २तृतीय पंथी इला जाधव,महाडीक,श्रेया टाक,तपस्या राठोड यांनी मिळून दिप प्रज्वलन केले.सुधाश्री च्या अध्यक्षा अॅड.माधुरी जोशी यांनी प्रस्तावना मांडली.त्यानंतर सुधाश्री च्या कार्यकर्त्यांना तृतीय पंथीयांनी राखी बांधली व त्यांना ओवाळणी देण्यात आली.
त्यानंतर तृतीय पंथी इला जाधव महाडीक,श्रेया टाक,तपस्या राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.समाज आज ही आम्हाला स्विकारत नाही.भिक नको काम हवे आहे ते मिळत नाही इज्जत मिळत नाही,समाजाची सेवा करायची आहे पण करता येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.या तृतीय पंथीयांना काम,समाजात स्थान मिळवून देण्यासाठी सुधाश्री बांधील आहे.आम्ही नक्की या विषयावर काम करु व तुम्हाला सोबत घेऊन जावू,समाजात स्थान तसेच नोकरी व्यवसाय मिळवून देण्यास प्रयत्न करु असे आश्वासन सुधाश्री च्या अध्यक्षा माधुरी जोशी यांनी दिले.
यावेळी सुधाश्री चे पदाधिकारी अनिल करंदीकर,सुभाष परुळेकर,आश्विन देशमुख,अभिजित पवार,अजिंक्य जोशी,उषा बोरसे,अश्विनी मुजुमदार व इतर कार्यकर्ते हजर होते.