अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हयाचेवतीने जिल्हाधिकार्यानां निवेदन सादर
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून जेष्ठ साहित्यिक तथा सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते,गीतकार शरद गोरे यांना संधी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हयाचे वतीने जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे व नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांच्या नेतृत्वाखालील साहित्यिक शिष्टमंडळाने केली आहे.
राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नव्याने निवड होणार आहे त्यात साहित्य, कला, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची शिफारस महाराष्ट्र सरकार राज्यपालांकडे करणार आहे,साहित्य क्षेत्रातून सुप्रसिध्द
साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत १९९३ साली त्यांनी साहित्य परिषदेची स्थापना केली,
साहित्य परिषदेचे वीस हजार सभासद असून आजवर त्यांच्या संस्थेने १५० हून अधिक साहित्य संमेलनं महाराष्ट्रात
विविध ठिकाणी आयोजित केली आहेत,
अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन,छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन,महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य साहित्य संमेलन,छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन ,बेळगाव मराठी साहित्य संमेलन ,ग्रामीण मराठी आदी संमेलनांचा समावेश आहे,नाशिक जिल्हयातही गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ११ ग्रामीण साहित्य संमेलन पार पडली आहेत.
गोरे यांनी एकूण १० ग्रंथाचे लेखन केले आहे,छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य भाषांतरित केला आहे ,युगंधर प्रकाशन या ते संपादक व प्रकाशक असेलेल्या संस्थेने आजवर १४४ पुस्तके प्रकाशित केली आहेत,त्यांनी लेखक दिग्दर्शक व संगीतकार म्हणून पाच चित्रपट व एक नाटक केले आहे, ज्यामध्ये रणांगण एक संघर्ष, प्रेमरंग , एक प्रेणादायी प्रवास सूर्या ऐतवी ,फुल टू हंगामा आदी चित्रपटांचा समावेश आहे, उत्तम शिवव्याखाते म्हणून ते महाराष्ट्रास परिचित आहेत आजवर विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत.
दरम्यान या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे, जिल्हा अध्यक्ष नवनाथ गायकर यांचेसह माणिकराव गोडसे,प्रदिप पाटिल, श्रीराम तोकडे, रविंद्र पाटिल, सौ.विदया पाटिल, बाळासाहेब गिरी, संजय कान्हव, गोरख पालवे, प्रशांत भरवीरकर, राजु आतकरी,योगेश जोशी, श्रीमती कल्पना सोनवणे, देविदास वारुंगसे, देविदास शिरसाट, सत्यवान वारघडे, शांताराम बर्हे, शिवाजी शिंदे, शिवाजी पगारे, शिवाजी क्षीरसागर, देवचंद महाले, सागर हांडे, अंबादास खोटरे, मधुकर कदम, तुकाराम चौधरी, बाबासाहेब थोरात, ल.का.भोये, देविदास चौधरी, मधुकर भोये, शांताराम वाघ, गायत्री शिरसाट, सुनिल कन्नोर, जनार्दन शिंदे, श्रीमती माधवी पारख, श्रीमती रोहिणी भगत, सौ.लता मधुकर पवार, नारायण कुवर, श्रीमती पुनम राखेचा आदिसह असंख्य साहित्यिक यावेळी उपस्थित होते.