भाळवणी प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता कोण सत्तेत आहे आणि कोणी विरोधात आहे ते समजत नाही असे मत स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केले.
ते भाळवणी येथील स्वराज्य संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी पांडूरंगचे संचालक भगवान चौगुले, राजेंद्रसिंह निंबाळकर, धैर्यसिंह निंबाळकर, सरपंच राजकुमार पाटील,श्री विठ्ठलचे संचालक समाधान काळे,सहकार शिरोमणी चे संचालक सुनील पाटील,नागेश पाटील,सचिन भोसले,पप्पू क्षीरसागर, रणजित जाधव,सागर चौगुले,तानाजी पाटील,महादेव चौगुले,प्रदीप शिंदे, हणमंत गायकवाड,रमेश सुरवसे, रवि शिंगटे,सुहास सराटे, उत्तम पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छ.संभाजी महाराज म्हणाले की,आम्ही पूर्वी वारस म्हणून दौरा करत होतो पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आताचा दौरा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केला जात आहे.आताचे राजकारणी रोज नवीन नवीन शब्दप्रयोग करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. राज्यात असलेले प्रश्न सोडवण्याकरिता राज्य सरकार लक्ष देत नाही. सोलापूर जिल्ह्यात असलेले डाळिंब संशोधन केंद्र हे काय करीत आहे ? हे शेतकरी वर्गास समजत नाही. या भागात डाळिंबाचे क्षेत्र कमी होत चालले आहे.याकडे कोणी हि लक्ष देत नाही.हे अतिशय चिंतेची बाब आहे. यापुढील काळात स्वराज्य संघटनेच्या मार्फत शेतकरी, विद्यार्थी ,महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले जाणार आहे याचा सर्व ग्रामस्थांनी फायदा करून घ्यावा असेही छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले.
यावेळी परिसरातील शिवप्रेमी व स्वराज्य प्रेमीनी मोठया प्रमाणात उपस्थित दाखवली होते.