शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्व निवडणुका ताकदीने लढवणार :बी.जे.देशमुख
मोहोळ प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला असून महाराष्ट्राच्या जनतेच्या व सर्व सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनात याबाबत मोठे कोडे निर्माण झाले आहे अशातच भारत राष्ट्र समितीचे केसीआर महाराष्ट्रात ब-या पैकी आपले वर्चस्व वाढवताना दिसत आहे.
भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे गेल्या पाच ते सहा महिन्यात महाराष्ट्रात बराच वेळा आले आहेत.
यामध्ये तेलंगणा राज्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोफत लाईट,मोफत पाणी, अलीकडे केलेली शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी अशा विविध योजनेअंतर्गत केसीआर काम करतात त्या च्याच कार्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी भारत राष्ट्र समितीकडे आकर्षीत होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समिती सोलापूर जिल्हा आढावा बैकींचे सत्र सुरू केले आहे यामधून भारत राष्ट्र समिती पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नव्या जुन्या कार्यकर्त्यांचे संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बी.जे.देशमुख म्हणाले की,यामध्ये तेलंगणा राज्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोफत लाईट,मोफत पाणी, अलीकडे केलेली शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी अशा विविध योजनेअंतर्गत मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे काम करत आहे अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या तरी आम्ही स्वागत करू परंतू नाही राबविल्या तर भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून आम्ही आगामी जिल्हापरिषद, नगरपरिषद, नगरपालिका,लोकसभा, विधासभा सर्व निवडणुका लढवू असा इशारा महाराष्ट्रातील इतर पक्षांना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी.जे.देशमुख यांनी दिला.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी.जे.देशमुख, सोलापूर जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, मोहोळ समन्वयक रमेश भोसले, शंकर भोसले, माढा समन्वयक तानाजी पाटील,पंढरपूर समन्वयक रमेश पवार, आण्णासाहेब पवार, सांगोला समन्वयक आप्पासाहेब वाघमारे,रणसिंह देशमुख, सोमनाथ नाईकनवरे, संतोष साठे, माळशिरस समन्वयक सचिन वाघमोडे,भरतराव रुपणवर, गणेश कदम,प्रविण सांवत,शुभम पाटील, अशोक कांबळे, सोलापूर शहर समन्वयक अख्खरताज पाटील,रघुरामुलू कंदिकटला, विक्रम पिस्के,दयानंद मानमाड, बार्शी समन्वयक संतोष बोरा, करमाळा आण्णासाहेब सुपणवर , अक्कलकोट समन्वयक सचिन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरीनी BRS पक्षात प्रवेश केला.