सांगोला प्रतिनिधी
राजकीय संत म्हणून ओळखले जाणाऱ्या स्व. भाई गणपतरावजी देशमुख यांचे नातू डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे आपल्या आजोबांच्या पाऊलावर पाऊल ठेवून जनतेची सेवा करताना दिसून येत आहेत. याचा परिणाम म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांची लोकप्रियता वाढत असून याचा प्रत्यय भाळवणी गटात सुध्दा मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे.
डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाने भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धणीने रूपांतर झाले असून भाळवणी परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे तसेच सर्व सामान्यांची मोठी सोय होणार आहे। भाळवणी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी स्वर्गीय आबासाहेबांची इच्छा होती त्यासाठी ते प्रयत्नशील होते परंतु दुर्दैवाने 2019 मध्ये शेकापचे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा पराभव झाल्याने व दोन वर्षांपूर्वी स्वर्गीय आबासाहेबांचे निधन झाल्याने ही बाब अपूर्ण राहिली होती.आपल्या आजोबांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेकापचे सरचिटणीस आमदार मा.जयंतभाई पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न व पाठपुरावा करून आरोग्य मंत्रालयाकडुन ही मान्यता मिळवली आहे.
ज्या उपचारासाठी याअगोदर पंढरपूर येथे जावे लागत होते ते उपचार आता भाळवणीतच मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निमित्ताने त्यांनी आपल्या आजोबांच्या पाऊलावर पाऊल ठेवून विकासाचा वारसा जपला असल्याची चर्चा सध्या लोकांमध्ये सुरू असून भावी आमदार म्हणून त्यांची जनप्रतिमा निर्माण होत आहे.
सदृढ जनतेच्या सुदृढ आरोग्य सुविधांसाठी सोलापूर जिल्ह्यातील भाळवणी येथे ग्रामीण रुग्णालय तसेच भंडीशेगाव येथे पालखी मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासंदर्भात शेकापचे चिटणीस आ. भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे गुरुवार दि. १६ मार्च २०२३ रोजी मुंबई येथे अधिवेशन कालावधीत समक्ष भेटून निवेदनाद्वारे मागणी केली होती अशी माहिती डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ नेते रफीक तांबोळी उपस्थित होते.
नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी अकलूज पंढरपूरला जावे लागते. अकलूज व पंढरपूर येथील रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात दळणवळणाच्या सोयी सुविधा देखील यामध्ये उपलब्ध नाहीत. भाळवणी व भंडीशेगाव या भागातील नागरिकांना सहज व सुलभरीत्या वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती होणे अत्यावश्यक झाले होते. अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांची देखील येथे ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी केली जात आहे. आरोग्य केंद्र निर्माण झाल्यास परिसरातील नागरिकांना सहज व सुलभरीत्या वैद्यकीय सोयीसुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
भाळवणी येथे ग्रामीण रुग्णालयाची व भंडीशेगाव येथे पालखी मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्राची नागरिकांची वारंवार मागणी होत होती. या परिसरात अद्ययावत असे रुग्णालय नाही त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंत्री ना. डॉ. तानाजीराव सावंत यांची मुंबई येथे अधिवेशन कालावधीमध्ये भेट घेऊन निवेदन सादर केले होते.सदरची मागणी तात्काळ मान्य होईल असा मला विश्वास होता. त्यास राज्य शासनाने ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालय म्हणून मान्यता दिली आहे.जनतेची ही रास्त मागणी पुर्णत्वास नेण्यासाठी यापुढील काळातही सतत पाठपुरावा केला जाईल.
डॉ. बाबासाहेब देशमुख, शेकाप नेते, सांगोला.