मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
फैजपूर येथे मातोश्री फाऊंडेशन पिंपरूड ने गुणवंत विद्यार्थी सत्कार व व्यवसाय मार्गदर्शन शुभदिव्य मंगल कार्यालयात आयोजित केले होते.
त्यावेळी विद्यार्थी, पालकाना मार्गदर्शन करतांना दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल जळगांव चे संस्थापक यजूर्वेंद्र महाजन यांनी सांगितले की आज स्पर्था परीक्षा, डॉक्टर इंजिनिअर चे व्यतिरिक्त शेकडो वाटा उपलब्ध आहेत, पण पालक, विद्यार्थ्यांची क्षमता, कल लक्षात न घेता कोर्स निवडतात, विद्यार्थी सुद्धा स्वतः सखोल विचार, आवड निवड न पहाता त्या मार्गाने जातात, परिणामी अयशस्वी होतात, त्यामुळे श्री महाजन यांनी विद्यार्थ्याना, पालकांना बोलते करून प्रश्न समजून घेतले आणि प्रश्नानुरुप उदाहरणासह, प्रात्यक्षिकासह व्यावसायिक शिक्षण वा कोर्स कसा निवडावा हे समजावून सांगितले,त्यासाठी अभ्यास मित्र, सारथी, करियर मित्र ही दीपस्तंभ प्रकाशन (8380033393)ची पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजे, मार्गदर्शन कसे घेतले पाहिजे याचे विश्लेषण केले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ते सदैव उपलब्ध असल्याचे सांगितले, समाजसेवक माजी मुख्याध्यापक श्री अशोकराव भंगाळे यांनी शालेय स्तरावर गरीब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध स्पर्धा परीक्षा, त्यांचे फायदे साविस्तर समजावून सांगितले. श्री महाजन मास्तरांचा दत्तक पुत्र अपंग,अनाथ, चित्रकार राज याने त्याचे यशस्वी अनुभव कथन केले आणि केलेल्या कष्टाचे फळ म्हणून त्याला जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश मिळाल्याची आनंददायी बातमी दिली.
वैशिष्ठ्य म्हणजे आधी सन्मा महाजन मास्तरांचे मार्गदर्शन झाले, त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, भारत विद्यालय व ज्यु कॉलेज न्हावी चे विद्यार्थ्यांनी इशस्तवन, स्वागत गीत गायिले, मातोश्री फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री जनार्दन जंगले यांनी प्रास्ताविक केले, मातोश्री फाऊंडेशन तर्फे दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेतील एका विद्यार्थ्याचा वर्षाचा येणारा ८०,००० रू खर्च देण्याचे जाहिर करून धनादेश सादर केला तर श्री अशोकराव भंगाळे यांनी मातोश्री फाऊंडेशन ला २१,००० रू चा धनादेश दिला.
त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन करण्यात आला, त्यावेळी व्यासपीठावर मान्यवरांसह मातोश्री फाऊंडेशन चे जनार्दन जंगले, चंद्रकांत जंगले, भारत विद्यालय न्हावी च्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी, माजी मुख्याध्यापिका शालिनी चौधरी, शुभदिव्य मंगल कार्यालयाचे संचालक निलेश चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संजय सराफ, प्रा यशवंत वारके ,कलाविष्कार चे चौधरी व्ही. ओ उपस्थित होते, आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सलीम तडवी यांनी केले तर सूत्रसंचालन बामणोद हायस्कूल चे ज्येष्ठ शिक्षक श्री निर्मल चतुर यांनी केले. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतल्यावर समारंभ संपन्न झाला.