रायगड प्रतिनिधी
दुर्गराज रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सोलापूर येथील ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळ) यांचे शिवाजी भाऊ भोसले - रायगड प्रतिष्ठान निराळे वस्ती सोलापूर यांचे माध्यमातुन रायगड किल्ला येथे ऐतिहासिक कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्या कीर्तना मध्ये सुधाकर महाराज इंगळे बोलत होते की , छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची समाज मनाला खूप गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मना मनात शिव विचार निर्माण काळाची गरज आहे. प्रत्येक मंदिरातील देव - मंदिरा वरील कळस राहिलेत ते फक्त शिवरायांच्या मुळे राहिलेत. घरा घरावर भगवा ध्वज लावण्याचे धाडस वर्तमान काळात तरुणांच्या मध्ये दिसून येत आहे. त्याला कारण शिव विचार आहेत. जाहीरपणे कीर्तन करण्याचा अधिकार हा शिवरायांच्या मुळे मिळाला असे कीर्तनातून इंगळे महाराजांनी सांगितले. प्रत्येक किल्ला हा स्वच्छ व पवित्र रहावा असे प्रयत्न प्रत्येक शिवभक्तांनी करणे गरजेचे आहे.
*" आम्ही तेणे सुखी | म्हणा विट्ठल विठ्ठल मुखी || "*
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगावर कीर्तन करत असताना शिवरायांची धर्मनिष्ठा , स्वराज्य प्रेम, त्याग , ई. विषय सप्रमाण पटवून देण्याचा प्रयत्न केला. रायगड येथे कोकण कडा मंडळ यांचे कडे सोहळ्याचे आयोजन असते. या मंडळाच्या वतीने सुरेश पवार यांनी गडावर पहिलेच कीर्तन केल्यामुळे सुधाकर महाराज इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
कीर्तनातील विशेष आकर्षण म्हणजे सर्व टाळकरी तरुण असून उत्साही दिसत होते. ह भ प जोतिराम चांगभले , ह भ प बळिराम जांभळे, दत्तात्रय अंबी , सचिन भोसले , गोविंद ताटे , हृषिकेश झांबरे , अजिंक्य मोरे , ई. शिव भक्तांनी परिश्रम घेतले.