खासदार,आमदार यांनी या रस्त्याच्या कामासाठी तात्काळ लक्ष देण्याची मागणी
म्हसवड प्रतिनिधी
पंढरपूर - सातारा या महामार्गाचे सन २०१६ साली एम एस आर डी सी मार्फत मेगा इंजिनियरिंग व गडोख यांचे डाॅली एन्टरप्रायजेस यांना अनुक्रमे सातारा ते म्हसवड व म्हसवड ते पंढरपूर असे टेंडर देणेत आले होते.
पंढरपूर येथील आषाढी वारी करिता या मार्गावरून लहान मोठ्या दिंद्या जातात.या रस्त्यावरील पुलाची कामे बंद पडली आहेत.त्यामुळे वारकऱ्यांना या मार्गावरून जाता येता त्रास सहन करावा लागत आहे. मार्गावरील अधिकारी व ठेकेदार जनतेची फसवणूक करीत आहेत. अधिकारी व ठेकेदार यादी गेंड्याची कातडी पांघरलेली आहे असे मत इंजिनिअर सुनील पोरे यांनी व्यक्त केल आहे.
सदर कामे टेंडर कंडीशन नुसार दीड वर्षात पुर्ण करावयाची होती मात्र डिसेंबर २०२२ उजाडला तरी अद्यापी काम पूर्ण झाले नव्हते म्हणून म्हसवड येथील इंजि सुनील पोरे यांनी २६ जानेवारी २०२३ रोजी उपोषण आरंभिले होते.
यावेळी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रशासकीय पातळीवरून दोन्ही भागातील उर्वरित कामे विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्याचे लेखी अभिवचन दिले होते त्या प्रमाणे 20 दिवसांत माणगंगा नदी पुल ते माळशिरस चौक या लांबीत रस्ता काॅक्रिटीकरण करून उर्वरित दिवड जवळील लांबीचे काम त्वरित सुरू करणार होते ते अद्याप सुरू केले नाही याबाबत जाब विचारण्यासाठी कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी घोडके यांचेशी संपर्क साधला असता पोलिस संरक्षण मिळणेत अडचण येत आहे व त्यासाठी 05 जून रोजी सातारा कलेक्टर समवेत बैठक असलेचे सांगितले.
दरम्यान म्हसवड पोलिसांशी संपर्क साधला असता सदर लांबीसाठी संरक्षणासाठी कोणीही संपर्क केलेला नसलेचे सांगितले तर माळशिरस चौक ते पंढरपूर या लांबी तील पिलीव घाटात वन विभागाची अडचण दूर होईपर्यंत अस्तित्वातील लांबीत डांबरीकरण 15 मे पुर्वी करावयाचे लेखी अभिवचन सोलापूर विभागाकडून प्रतिनिधी यांनी उपोषण दरम्यान दिले होते त्या कामाची पाहणी केली असता अद्यापी बरेच काम ठरले नुसार पुर्ण न केलेचे निदर्शनास आले आहे .
ही क्रुर जनतेची चेष्टा चालवली असलेची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली व आतापर्यंत झालेल्या जीवित व वित्त हाणीस जबाबदार कोण ? अशी या वेळी भाजप ओबीसी युवक प्रदेशाध्यक्ष करण पोरे, लुनेश विरकर, बाळासाहेब पिसे,संजय भागवत,बबन आबदागिरे, पत्रकार पोपट बनसोडे, पिसे आदी उपस्थित होते. सदर रस्त्याच्या कामाची त्वरित दखल घेऊन सुधारणा न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.