हा तर सत्याचा असत्यावर विजय.
सोलापूर: आज दुपारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 92 मीटर अनाधिकृत को जनरेशन चिमणी चे पाडकाम पूर्ण झाले. 2012 सालापासून सोलापूरच्या होटगी रोड विमानतळास व विकासाला लागलेले ग्रहण सिद्धेश्वरांच्या कृपेने सुटले आहे .सोलापूर विचार मंचच्या गेल्या ४ वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. आजचा दिवस हा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. 1930 मध्ये सोलापूरने जसे चार दिवसांच्ये स्वातंत्र्य उपभोगले व पूर्ण देशभर नावलौकिक मिळवला त्याचप्रमाणे सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांनी उभा केलेल्या लढ्यास प्राप्त झालेले हे यश आहे व हे उदाहरण सर्व भारतभर गौरवले जाईल. या अनधिकृत चिमणीच्या बाबतीत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पुढाकार किंवा पाठिंबा दिला नाही या उलट चुकीच्या बातम्या व अफवा पसरवल्या हे अत्यंत खेदाचे आहे. हि को जनरेशनची चिमणी पडल्यामुळे कारखान्याच्या गाळापावर कोणताही परिणाम होणार नाही व पुढील हंगामात 5000 मेट्रिक टन गाळप हा कारखाना आपल्या पूर्वीच्या दोन चिमण्यांवर सक्षमरित्या करू शकतो. त्यामुळे या कारखान्याच्या सभासद शेतकरी व कामगारांनी निश्चिंत राहावे. परंतु आता कारखान्याची सूत्रे अत्यंत जबाबदार व्यक्तीच्या हाती सोपवल्यासच हा कारखाना भविष्यात वाचू शकेल. भारतीय विमान प्राधिकरणाकडून उडान योजनेअंतर्गत सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी एक रुपयाचा सुद्धा खर्च लागणार नाही कारण होटगी रोड विमानतळ हे संपूर्णतः सुसज्ज आहे.लवकरच सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू होऊन सोलापूरचा वर्षानुवर्ष रखडलेला विकास सुरू होईल व सोलापूर पुन्हा एकदा आपले नाव लौकिक प्राप्त करेल. या उदाहरणातून चुकीच्या गोष्टींचा अंत अत्यंत दारुण पद्धतीने होत असतो हे शिकण्यासारखे आहे. या लढ्यामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे मदत केलेल्या सर्वांचे व मीडियाचे मनःपूर्वक सोलापूर विचार मंच तर्फे आभार.
डॉ. संदीप आडके.सोलापूर विचार मंच.
९८२२८०७००७.