पिलीव प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे सन 1956 सालापासून रयत शिक्षण संस्थेची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव ही शाखा गुणवत्तेची परंपरा जपत आज अखेर पर्यंत अविरतपणे कार्यरत आहे.या शाळेला स्वतः डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भेट दिली असल्याचे जाणकार मंडळींकडून बोलले जाते.
या शाळेमध्ये अनेक मोठमोठे अधिकारी,पदाधिकारी घडले असून भविष्यात ही घडणार आहेत.निष्कलंक संस्था म्हणून महाराष्ट्रात एकमेव संस्था राहिली आहे ती म्हणजे रयत शिक्षण संस्था आणि त्याच संस्थेच्या पिलीव शाखेतील विनाअनुदानित वर्ग सोडून अनुदानित असूनही अकरावी बारावी च्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये प्रवेश फी म्हणून परीक्षा फी च्या नावाखाली पिळवणूक चालू आहे.गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून रयतेचे जनक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रक्ताचे पाणी करून ही संस्था नावा रूपाला आणली.
परंतु काही एखाद्या दुसऱ्या शिक्षकांच्या चुकीच्या धोरणामुळे संस्थेला गालबोट लागू नये व गोरगरीब विद्यार्थ्यांची पिळवणूक होऊ नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुजित दिगंबर सातपुते यांनी पाचवी ते बारावी या विद्यार्थ्यांना कर्मवीर विद्यालय व रमेश खलीपे जुनिअर कॉलेज पिलीव या शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळावा अन्यथा प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 30 जून रोजी अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन शाळेचे मुख्यध्यापक शिवाजीराव कापसे यांना दिले आहे.
सदर प्रसंगी काही अनर्थ घडल्यास शाळेचे मुख्यध्यापक व स्टाफ हे सर्वस्वी स्वतः जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देते वेळी जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,पत्रकार संजय पाटील,तानाजी लोखंडे उपस्थित होते.