*माझं गाव,माझी जबाबदारी*
~शिस्त की बेशिस्त यात आमचा काय संबंध मी गावचा म्होरक्या....~
माझं गाव,माझी जबाबदारी समजून संपूर्ण गावच्या गाव, गावच्या विकास कामांसाठी एकत्र आले. तर गावचा कायापालट होण्यास जास्त वेळ लागणार नाही.
गावाला एकत्रित आणण्याची भूमिका गावातील विकास पुरूष ( ढोंगी, स्वार्थी,लुटारू, भामटे ,पापी, आत्मकेंद्री,सावळा गोंधळ घालणारे लबाड लांडगे सोडून) सत्याला सत्य व लबाडाला-लबाड म्हणण्याची धमक असणारे म्होरके जेव्हा गावो-गावी निर्माण होतील..
*तेव्हा कुठे,माझे गाव बदलत आहे म्हणता येईल.*
गरज असेल तेव्हा गोड शब्दांत उपदेश करणारे,निर्लोभी,मानापनाच्या पलिकडे जाऊन स्पष्टपणे व परखडपणे लोकांस उपदेश करणारे गावचे म्होरके जेव्हा निर्माण होतील.
*तेव्हा कुठे, म्हणता येईल की माझे गाव बदलत आहे.*
*जे का रंजले,गांजले त्यासी म्हणे जो आपुले!*
गावातील दुःखी,पीडीत व शोषित तसेच त्रासलेल्या व गांजलेले जे जे कोणी आहेत.त्यांना उदार अंतःकरणाने जवळ करणारे म्होरके जेव्हा गावो-गावी निर्माण होतील.
*तेव्हा कुठे,म्हणता येईल की माझे बदलत आहे.*
गावातील म्होरके जसी आपल्या मुलांची काळजी घेतात.तशीच गावातील मुले ही माझीच आहेत असे समजून त्यांच्या संरक्षणाची व शिक्षणाची जबाबदारी उचलतील. ज्यांना कोणी संभाळत नाहीत.अशांची ममतेने चौकशी करणारे म्होरके गावोगावी तयार होतील.
*तेव्हा कुठे,म्हणता येईल की माझे गाव बदलत आहे.*
गावच्या विकासाचा छंद जडलेले म्होरके गावोगावी असावेत. मलाच काम मिळावे व मिळालेल्या टक्केवारीच्या पैशातून माझे कुटुंब,माझी जबाबदारी म्हणणारे, लोभी मरतुंगडे म्होरके गावात नसावे.विकास कामांच्या वेळी प्रसंग आला तर वज्रासही भेदतील असे सामर्थ्य अंगी असणारे म्होरके जेव्हा गावो-गावी निर्माण होतील.
*तेव्हा कुठे, म्हणता येईल की, माझे गाव बदलत आहे.*
कपाळाला अंगारा, कपाळाला बुक्का लावला,उभ्या- आडव्या टोप्या, अंगावर पांढरे शुभ्र कपडे, अंगावर व हातात पिवळे धातू दाखवत,सेंट -अत्तरच्या बाटल्या अंगावर फोडल्या म्हणजे त्याला चांगला म्होरक्या म्हटले जात नाही.ज्या म्होरक्याचे मन गंगेच्या पवित्र निर्मळ पाण्यासारखे आणि वागणूक स्वच्छ व पवित्र असते.असेच म्होरके जेव्हा गावो-गावी निर्माण होतील.
*तेव्हा कुठे, म्हणता येईल की, माझे गाव बदलत आहे.*
गावातील एखाद्या कामात टाळाटाळ व भ्रष्टाचार होत असेल तर म्होरक्यांचे मनच कासावीस झाले पाहिजे.मी पाच दहा वर्षे या पदावर राहील पण येणाऱ्या ५० पिढ्या माझ्या एका निर्णयामुळे बरबाद होतील.हे जेव्हा गावो-गावी च्या म्होरक्यांच्या मनाला लागेल.
*तेव्हा कुठे, म्हणता येईल की माझे गाव बदलत आहे.*
धनसंपत्ती पेक्षा मुला-मुलींचे शिक्षण, आरोग्य,ग्रामीण रोजगार, व्यायामशाळा, सरकारी दवाखाने, स्वच्छ पाणीपुरवठा, शाश्वत विजपुरवठा, शासकीय अधिकारी,गावातील विविध प्रशासकीय यंत्रणा यांच्या बारकाईने लक्ष ठेवून असणारे शिवाय गावच्या नैसर्गिक संसाधनाची लचके तोड करणाऱ्यांना योग्य शासन देणारे म्होरके जेव्हा गावो-गावी निर्माण होतील.
*तेव्हा कुठे, म्हणता येईल की,माझे गाव बदलत आहे*
# माझे गाव बदलत आहे.
#बदल करणे हे माझे कौशल्य आहे.
# गाव कामात भ्रष्टाचार केला तर तशीच लचके तोड शेवटी माझी होईल.
# सत्य परेशान हो सकता है, पराजीत नहीं..
प्रा.आनंदा आलदर