मायणी प्रतिनिधी
खटाव तालुका मायणी ग्रामपंचायत ने स्मशानभूमी साठी बांधण्यात आलेल्या पाण्याची टाकी करिता लाखो रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या हितासाठी सोयीसाठी आणलेला असून या टाकीचे काम पूर्ण होऊन ६ महिने झाले असता याचे पैसे ठेकेदारांना मिळाले पण अद्याप पर्यंत स्मशानभूमी मध्ये येणाऱ्या अनेक नागरिकांना अंत्यविधीसाठी पाणी मिळेना.
ग्रामपंचायतने स्मशानभूमीसाठी बांधलेल्या टाकीमध्ये अद्याप पाण्याचे कनेक्शन दिले नाही तरीही ठेकेदारांची कामाची रक्कम मिळाली कसी ?असा प्रकार घडलाच कसा.अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
अशा ठेकेदारावर व बिल काढणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी गावातील सामाजिक संघटना व नागरिक निवेदन देणार असल्याची माहिती नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.तात्काळ पाणी पुरवठा केला जावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.