पुणे प्रतिनिधी
पंढरपूरातील आषाडी वारी निमित्त श्रीक्षेत्र जेजुरीत आलेल्या वारकऱ्यांसाठी अमोल पाटील यांनी वारीतील ३००० वारकऱ्यांना अन्नदान व ५००० वारकऱ्यांसाठी बिस्कीट वाटप करण्यात आले. गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या भाविक वारकऱ्यांसाठी अमोल पाटील यांनी वारकरी जेंव्हा श्री क्षेत्र जेजुरीत आले तेंव्हा त्यांनी कमीतकमी ३००० वारकऱ्यांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित केला.
याबरोबरच त्यांनी कमीतकमी ५००० वारकरी बंधूभगिनींसाठी मोफत बिस्कीट वाटप करण्याचे आयोजन केले. यापूर्वीही अमोल पाटील यांनी समाजामध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील गरजू व गरीब नागरिकांना वेळोवेळी मदत करून आपली सामाजिक बांधिलकीची जपणूक केली. याप्रसंगी अमोल पाटील यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पुढील वारीसाठी शुभेच्छा दिल्या.