मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
मुंबई भाजप हॉकर्स युनिटचे अध्यक्ष आणि मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांना फेरीवाल्यांच्या दयनीय स्थितीची माहिती दिली.
महापालिका आणि पोलिसांच्या अमानुष कारभारामुळे मुंबईतील फेरीवाल्यांची अवस्था बिकट झाल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. व्यवसाय करता येत नसल्याने फेरीवाले व त्यांच्या कुटुंबियांसमोर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे.
आमदार कालिदास कोळंबकर म्हणाले की, फेरीवाल्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे. फेरीवाल्यांना पाठलाग करून मारले जाते. फेरीवाले वाचवायचे असतील तर पोलिस आणि बीएमसीची कारवाई थांबवायला हवी. त्यांची मुले उपासमारीने त्रस्त आहेत. शाळेची फी भरता येत नाही. बँकर्स घरी वसुलीसाठी गुंड पाठवत आहेत. घरात आजार आहे, औषधाला पैसे नाहीत.
16 Jun 2023 दिवशी शिष्टमंडळाने शेलार यांची मुंबई भाजप कार्यालयात भेट घेतली. यामध्ये हॅकर्सच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आठवडाभरात हॅकर्सचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शेलार यांनी दिले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, संजय उपाध्याय, संतोष पांडे, सूर्यकांत कुरणाळकर, संजय दास्ताने, जितेंद्र गुप्ता, जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
भवानजींनी सांगितले की, उपासमारीने मेटाकुटीला आलेल्या पाच लाख कुटुंबांशी संबंधित हा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना व्यवसाय करू द्यावा. फेरीवालेही याच देशाचे नागरिक आहेत. त्यांच्यावर अत्याचार होता कामा नये.