पंढरपूर प्रतिनिधी
विठठलचे चेअरमन अभिजीत पाटील हे सरकोली गावात आलेनंतर भालके यांना नेता मानतात आणी तालुक्यातील दुसऱ्या ठिकाणी भाषण करताना भालकेंना जेलची भिती घालतात. हा त्यांच्यातील मोठा दुर्गुण आहे. त्यामुळे त्यांचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे असा प्रकार आहे. असा घणाघात विठठलचे माजी चेअरमन भगिरथ भालके यांनी केला आहे.
सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सरकोली येथे सत्ताधारी काळे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, शिवसेनेचे नेते साईनाथभाऊ अभंगराव, विठठल परिवाराचे नेते युवराजदादा पाटील, ॲड.गणेशदादा पाटील, सहकार शिरोमणीचे माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालक सुधाकर कवडे, शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे, नितिन बागल, माऊली जवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भगिरथ भालके म्हणाले विठठलच्या निवडणुकीत आमच्या चुका झाल्याने आमच्या मतविभागणीमुळे तुम्ही चुकून कारखान्यावर बसला आहे. परंतू आमच्या भागातील कर्तव्यात कसूर न केलेल्या कामगारांनाही केवळ आमच्या द्वेषापोटी कामावर रुजू करुन घेतले नाही. हा आपला कुटील डाव आहे. यामुळे तुमचा या निवडणुकीतही आमच्यामध्ये विघ्न आणण्यासाठी जुन्या विनाकारण उजाळा देवून गैरसमज पसरविल्याचे कृत्य चालविले आहे. यामुळे या निवडणुकीत आम्ही तुमचा डावात फसणार नाही असेही भालके यांनी सांगीतले.भालके कुटुंबियांवर गुन्हे दाखल करु अशी धमकी दिली जात आहे. परंतू स्व.भारतनाना भालके अन्यायाविरुध्द लढा देत असताना गुन्हे अंगावर घेतले आहे. ही आमची परंपरा आहे. अशा या भालके कुटूंबियांना जेलची भाषा शिकविण्यापेक्षा तुम्हाला जेल मधून कोणी सोडविले या भालके कुटुंबियांची जाण मनात ठेवा असेही भागिरथ भालके यांनी ठणकावून सांगीतले.
विरोधकांनी आंबे येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये विठठलचे माजी संचालक राजाराम सावंत यांनी आमच्या गावातून सत्तर टक्के मतदान न झाल्यास आपण वेशीतून ये-जा करणार आहे असे आव्हान स्विकारले आहे. परंतू ते राजाराम सावंत यांनी वेशीतून जाणे-येणे यापुर्वीच बंद केले आहे असा टोलाही भागिरथ भालके यांनी राजाराम सावंत यांना लगावला आहे.
सरकोली येथील झालेल्या बैठकीत विठठल परिवाराचे नेते युवराज पाटील यांनीही अक्रमक होत अभिजीत पाटील यांच्यावर कडक शब्दात टिका केली. विठठलच्या निवडणुकीत आम्ही केलेल्या चुकामुळे आम्हाला जे चटके बसत आहेत. यामुळे आम्ही या निवडणुकीपासून एकत्रित राहून सर्व निवडणुका लढविणार असल्याचेही सांगीतले. आमच्या मतभेदाने दुसऱ्याचे फावले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही सावध होवून ही निवडणुक जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही युवराज पाटील यांनी यक्त केला आहे. सध्या भुलथापा करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्याकडून आले पैसे तरी घ्या, परंतू मत मात्र कपबशीलाच द्या असे आवाहनही युवराज पाटील यांनी केले आहे.
यावेळी ॲड.गणेश पाटील यांनीही आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात बोलताना अभिजीत पाटील यांच्यावर कडक शब्दात टिका केली. 2004 च्या विधानसभेच्या निवडणुकीतील चर्चा पुन्हा नव्याने रंगवून विठठल प्रमाणे सभासदांची फसगत करण्याचा कुटील डाव हा सभासद सहन करणार नाही. तुम्हाला केवळ आमदारकीचे डोव्हाळे लागले आहे. यासाठी तुम्ही या कारखान्याच्या निवडणुकीत उतरले आहात. परंतू तुमची ती आमदारकीची तलफ भगिरथदादा भालके नक्की भागवतील असेही गणेश पाटील यांनी परखडपणे सांगीतले.
याबैठकीत चेअरमन कल्याणराव काळे, शिवसेनेचे नेते साईनाथभाऊ अभंगराव, सहकार शिरोमणीचे माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले,भारत बागल, नितिन बागल, समाधान फाटे, सुधाकर कवडे यांच्यासह अनेकांनी भाषण केले.
तुमच्या विरजनाचे या निवडणुकीत दही होणार नाही : सुधाकर कवडे
विठठलच्या निवडणुकीत आम्ही विरजन टाकणारी माणसे आहोत असे जाहीर पणे सांगणाऱ्यांनी दही नासवले होते. त्यामुळे या निवडणुकीत अशाच प्रकारे निवडणुक लावून या निवडणुकीत भुलथापा मारण्यास सुरुवात केली आहे. परंतू काळे गटासाठी कोणीही विरजनाचे पातेले घेवून फिरले तरी निष्ठावंताचे चिरे कायम सोबत असल्यामुळे त्यांना कसलीही चिंता राहणार नाही. असे संचालक सुधाकर कवडे यांनी नांव घेता ॲड.दिपक पवार यांच्यावर निशाना साधला आहे.