पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये आण्णासाहेब पाटील मागास महामंडळाकडून कर्ज घेवून अनेक तरुण उद्योजक बनले आहेत. मात्र शासनाने इतर महामंडळाप्रमाणेच सहकारी बँकेकडून 12 टक्के पेक्षा जास्त होणारी व्याज दराची आकारणी करून महाराष्ट्र शासनाने भरावी त्यामुळे ही योजना अधिक सुकर होईल असे मत निशिगंधा सहकारी बँकेचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले.
पंढरपूर येथे निशिगंधा सहकारी बँकेच्यावतीने आयोजित केलेल्या ग्राहक मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रमुख वक्ते पवन झंवर, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक योगेश वाघ, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष माऊली पवार, उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यापार व उद्योग विभागाचे राज्यप्रमुख नागेश फाटे, यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्ात आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मिळाणाऱ्या व्याज परताव्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या 12 टक्के व्याज दराने दिली जाते. मात्र नागरी सहकारी बँकांकडून अशा कर्जदारांकडून ज्यादा व्याज दराची आकारणी केली जाते. हा भुर्दुंड तरुण उद्योजकांना सहन करावा लागतो व त्याचा परिणाम एकंदरीत नफयावर होतो.
त्यामुळे सहकारी बँकांकडून होणारी जादा व्याज दराची आकारणी महामंडळाकडून भरण्यात यावी असे काळे यांनी सांगीतले. यावेळी चार्टंड अकौंट पवर झंवर यांनी उद्योगातील बारकावे लक्षात घेतल्याशिवाय उद्योजकांना आधिकचा नफा मिळविता येत नाही. केंद्र सरकारने नव्याने आनलेल्या आयकर धोरणाचा बाऊ करण्यापेक्षा त्याचा अभ्यास करुन त्याला सामोरे जावे त्यासाठी उद्योजकांनी आर्थिक नियोजन करावे असे सांगून नव्या आयकर धोरणातील गैरसमजुतीवर प्रकाश टाकला.
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ यांनी आपल्या भाषणात निशिगंधा सहकारी बँकेने जिल्हयामध्ये सुरुवातीच्या काळात सर्वात पुढे येवून महामंडळाच्या कर्ज प्रकरणाचे वाटप केले. आज अनेक बँका कर्ज वाटपासाठी महामंडळाकडे करार करण्यास पुढे येत आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात निशिगंधा सहकारी बँकेने पुढाकार घेतल्याने सोलापूर जिल्हयामध्ये महामंडळाच्या प्रकरणाची वाढ झाली असे सांगीतले. तर माऊली पवार यांनी आजही राष्ट्रीयकृत बँकाकडून महामंडळाची कर्जे वाटप करताना नाक मुरडले जाते त्यामुळे मराठा समाजातील युवकांनी एकत्रित येवून महामंडळाची चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये नागेश फाटे यांनी महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाचा तरुणांनी सुनियोजित पध्दतीने वापर करुन उद्योगामध्ये वाढ करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी उपस्थितांचे स्वागत माजी व्हा.चेअरमन आर.बी.जाधव यांनी केले तर विद्यमान व्हा.चेअरमन डॉ.राजेंद्र जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रामास स.शि.वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर कवडे, मारुती भोसले, बाळासाहेब कौलगे, आण्णासाहेब शिंदे, भारत कोळेकर, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, तसेच निशिकांना बँकेचे संचालक अनिल निकते महेश पटवर्धन, ॲड. क्रांती कदम, शोभा येडगे, भागवत महाराज चवरे, भानुदास सावंत, देविदास सावंत सर व्यवस्थापक कैलास शिर्के व सर्व कर्मचारी वर्ग व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.