- प्रा. दीपक द. निकते, पंढरपूर, ७७०९३०६१६७.
"मन" एक सुंदर शब्द ! त्याच्या आधी 'न लावला तर "नमन" आणि नंतर 'न' लावला तर "मनन" होते। नमन ते मनन हा प्रवास ज्याला जमतो तेच स्थितप्रज्ञ असतात. अशा व्यक्तींना सुखदुःखे समे कृत्वा असतात. या स्थितप्रज्ञांच्या मांदियाळीतील ईश्वरनिष्ठ व्यक्ती म्हणजे भागवताचार्य प्र.द.निकते गुरुजी. निकते या शब्दांचा अर्थ निक्= शुद्ध, जे शुद्ध ते निकले प्रकाश दत्तात्रेयनिकते हे अस्मादिकांचे ज्येष्ठ बंधु 'दादा' म्हणूनच आम्ही त्यांना संबोधतो, श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींनी, स्थितप्रज्ञ मनाची तुलना थेट स्वयंप्रकाशी सूर्याशी केलेली आहे. माऊली म्हणतात-
" सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वातीवरी।। कान लविजे अंधारी कडेल तो ।।"
मतितार्थ असा, "सूर्याच्या घरी प्रकाशासाठी वाती लावाव्या लागतात का? याती लावून प्रकाश केला नाही तर सूर्य अंधाराने कॉइन जाईल का? अर्थात नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने समाधान पावलेला जो असतो तो स्थित नमन ते मनन या प्रवासात दादांना शारिरीक व्याधी कधीच अडथळा ठरल्या नाहीत, उलटपक्षी हे भोग भोगताना संत वाड:मयाच्या अभ्यासाने श्रीमद् भगवद् गीता, भागवत, रामायण, महाभारतसारख्या धर्मग्रंथाच्या अभ्यासाने आणि श्री संत नामदेव चरित्राचा अभ्यास करताना ज्ञानेश्वरीप्रमाणे नामदेवगाथा पारायण प्रत उपलब्ध करण्याच्या ध्यासाने दादा इतके तद्रूप झाले की त्यापुढे शारिरीक भोग शून्य ठरले. संत नामदेवांच्या ध्यासातून निर्माण झालेली भक्ती यामुळेच संशोधनाने 'सत नामदेव गाथा', संत नामदेव गाथा पारायण प्रत साकारली. यातील प्रकरण १८ ते २२ या पाच प्रकरणात अनुक्रमे श्री संत ज्ञानेश्वर, सोपानकाका, चांगदेव, मुक्ताबाई आणि श्री संत निवृत्तीनाथ यांच्या समाधची वर्णने जो सव नामदेवांनी केलीत त्यांची सामुदायिक पारायणे अनुक्रमे श्रीक्षेत्र आळंदी, सासवड, पुणतांबे, मुक्ताईनगर आणि त्र्यंबकेश्वर येथे २००६ मध्ये जावून निकले गुरुजींनी पारायणासह केलात. त्यांची सांगता त्या त्या संतांच्या प्रचलित अशा आरतीने परिपूर्ण झाली. पारायणप्रतीमध्ये या संताच्या आरत्या असल्याने पारायण सुलभ होवून तृप्तीचे समाधान हो लाभते आणि भक्तीभाव ही वृद्धिगत होतो, ही वस्तुस्थिती आहे. हा लाभ सर्व प्रातांना व्हावा यासाठी हिंदी आणि पाश्चिमात्यांसाठी इंग्रजीत संत नामदेव गाथा भाषांतरित केल्याने 'प्रकाश' हा स्वयंप्रकाशित ठरला. नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक डॉ. मो. ग. तपस्वी जेव्हा नामदेव गाथा हिंदीमध्ये करीत होते तेंव्हा अखेरच्याक्षणी नाशिकचे आमचे भावोजी . प्रा. रवींद्र अंबादासशेठ खड़े यांना तपस्वीनी फोनवर संपर्क केला. "हलो 55 खसर हिंदीमध्ये नामदेव गाथा पूर्ण झाली. रोज पहाटे लिहितांना साक्षात श्री पांडुरंग माझ्या शब्दवून उभे होते. भाग्य माझे थोर म्हणूनच श्री विठाई माऊलीच माझ्यासाठी सरस्वती ठरली. खरच कृतार्थं वाटतं." तपस्वींची ही कृतार्थता समापनाची होती. आता दुसरे काय हवं हे सांगणारीच ठरली.
खरं तर श्री संत नामदेव गाथा अभ्यासण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु प्र.द.निकते गुरुजींनी ज्या दृष्टींनी केला त्यामध्ये अखिल मानव जातीतून नामदेव भक्तांची मांदियाळी साकारावी हा हेतू होता. यासाठी सर्वप्रथम संताना जातीपातीच्या चौकटीतून बाहेर काढावे हा ध्यास दादासाहेबांनी घेतला. याचे कारण शिपीयाचे कुळी जन्म सब झाला । परि हेतु गुतला सदाशिवी ।। नामा म्हणे तसा जातीचा मी शिंपी। उपमा जातीची देऊ नये।। "हा भाव जाणताच दादांनी संत जातीच्या चौकटीत नसुन त्यांची जात, धर्म, पंथ एकच, 'मानवता, बंधुता, समानता.' हे सर्वांना समजावे यासाठी सांप्रदायिक अशा सा. 'पंढरी संदेश' मध्ये लेखन करीत दिवाळी विशेषांक एका संत महात्म्यावर साकारत कथा, कीर्तन, प्रवचनाचा मार्ग अनुसरला. पत्राद्वारे संत नामदेव अभ्यासक्रमाचे सत्र सर्वांसाठी सुरु करून सकल मानवाना संत नामदेव माझेच वाटू लागले, हा अभ्यासक्रम यशस्वी करणाऱ्यांचा पदवीदान समारंभ अव्याहत चालू ठेवले आहे. त्यास सर्व समाजाचा लाभणारा सहयोग लक्षणीय असा आहे. एवढयावरच न थांबता सातारा जिल्ह्यातील कास तलावाच्या नजिक अशा निसर्गरम्य 'शेवडी वाघोळी' येथे असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूरचे प.पूज्य आण्णा महाराजांच्या आश्रमात पहिला "श्रीसंत नामदेव गाथा स्वाहाकार यज्ञ' त्यांच्याच शुभहस्ते संपन्न केला. या अलौकिक कार्याची दखल घेवून पुणे विद्यापीठाचा पहिला संत नामदेव पुरस्कार प्र.द.निकते गुरुजींना पंढरपूरातील संत तुकाराम भवनामध्ये सन्मानपूर्वक दिला तेंव्हा पुणेकर ज्यांना स्विकारतात त्यांना सर्वच स्विकारतात या भाकीतांची प्रचिती आजमा विदूवत गौरव पुरस्काराने येते.
मनन से नमन या प्रवासात संतांनी मळविलेल्या वाटेनी प्रवास करताना प्र.द.निकते गुरुजींना सद्गुरु पै. अनंतराव आठवले अर्थात स्वामी वरदानंद भारती, औसा संस्थानचे चौथे मठाधिपती वै.ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर, संत नामदेवांचे पंधरावे वंशज वै.ह.भ.प. श्रीनामदेव पंढरीनाथ नामदास महाराज ते वेदशास्त्र संपन्न ह.भ.प. श्री. बाळशास्त्री हरिदास अशा अनेकविध परिसस्पर्शर्शन दादासाहेब समस्त वारकरी सांप्रदायाचे झाले. प्रतिवर्षी पंढरपूरच्या औसेकर मठामध्ये नामदेव गाथा पारायण होते एवढेच नव्हे तर औसेकरांच्या प्रत्येक कार्यात दादांचा वाटा असला तरी तो खारीचा वाटा आहे ही दादाची भावना म्हणजे संत नामदेवांच्या पसायदानाचे दृश्य स्वरूप आहे. कारण, दादांचा आत्मा नामदेव आहे. म्हणूनच नित्य नामदेवांच्या अभंगातील एक तरी ओवी अनुभवावी यासाठी 'नामदेव चितनिका' त्यांनी साकारली. ती तर प्रत्येक दिवसासाठी मिळालेली आत्मशुद्धीची शिदोरी आहे. हिच्या वाचनाने नराचा नारायण होता येते या प्रचितीने काही जणांनी विविध माध्यमाद्वारे ती प्रगट करून प्र.द.निकते गुरुजींच्या नामदेवभक्तीप्रमाणे सारा समाज नाममय, नामदेवभक्तजखा यासाठीचे हे प्रयत्न म्हणजे दादांच्या भावभक्तीची उंची कळते. पण, ती कोणत्याही मोजमाप पट्टीने मोजता येत नाही.
श्रीमद् भागवत कथा कथनाचे, नामदेव गाथा पारायणाचे अनेक सप्ताह जिथे जिथे करता येतील तिथे तिथे निष्काम भावनेनी भावभक्तीच्या हेतूने करुन सांप्रदायाची गोडी दादा वृद्धिंगत करीत असतात. नवपि संस्कारक्षम करण्याच्या प्र.द.निकते गुरुजींच्या कार्यानी नामदेवगाथाती दादांना धर्मक्षेत्रात केलेल्या स्पृहणीय कामगिरीबद्दल यंदाचा ४० वा छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणेचा "जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार" श्रीक्षेत्र पंढरपूरातील श्रीशनैश्वर धाम मंगल कार्यालय, सांगोला रोड येथे ज्येष्ठ शु. त्रयोदशी शुक्रवार दि. २ जून २०१३ रोजी छ. शिवरायाच्या राज्यभिषेकाचे दिनी स. १०.३० च्या मुर्ती प्रदान करण्यात येत आहे. अध्यक्षस्थानी प.पू. आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज, बीड विराजमान असून विशेष अतिथी धर्मभास्कर प.पू. सद्गुरुदास महाराज अर्थात पूर्वाश्रमीचे सुप्रसिद्ध शिवकाकार श्री विजयराव देशमुख यांचे उपस्थितीत संपन्न होत आहे तो केवळ ह.भ.प.श्री.प्र.द.निकते गुरुजींचा नसून तो भावभक्तीचा गौरव नाही का? नामदेवगाथाव्रती दादासाहेबांच्या गौरवाचे आपण सर्व उपस्थित साक्षीदार ठरणार असल्याने हा भावपूर्ण सोहळा भावभक्तीचाच गौरव असल्याने उत्तरोत्तर नामदेव गाथावती प्र.द.निकते गुरुजीकडून अशीच गौरवास्पद कार्य होण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेनी उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य त्यांना द्यावे हीच प्रार्थना ।
संकलन - नंदकुमार देशपांडे