"भले शाब्बास दादासाहेब" समाधान वसंतराव काळे.
पंढरपूर प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर दिसत असताना काही लोकांनी आपण कुटुंबावर नाराज असल्याचे चित्र उभे करण्याचे प्रयत्न चालू केले नी काहींनी तर जाहीर कार्यक्रमामध्ये ह्यावर भाष्य केले, काही माध्यमांनी ह्याबाबत एक प्रकारे गुढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सहाजिकच दादांवर *(स्व.वसंतराव काळे.)* प्रेम असणारे आम्ही थोडे सद्गदित झालो पण काल-परवा त्यांनी प्रसारित केलेली तुमची ध्वनिचित्रफीत बघितली नी मन भारावून गेले.
तुम्ही बोलताना तुमच्यातील आवेश नी आक्रोश बघून खरच स्व.दादाच नजरेसमोर उभे राहिले, *समाधानदादा* तुम्ही बोलत असताना सर्वसामान्य नागरिकांप्रती तुमच्या मनात असलेली आपुलकी नी आस्था दिसून आली. तुम्ही म्हणालात की आशेने तुमच्यापर्यंत आलेल्या व्यक्तीच काम आपल्या हातून न झाल्याचे दुःख प्रचंड ही भावनाच भली मोठी.
तालुक्यातील सत्तास्थानात आपला पक्ष/आपला गट थोडासा संयमित असल्याने जाणवत असलेली अडचण व त्यामुळेच आलेली हतबलता. हीच गोष्ट घुसमटीत रुपांतरीत झाली नी होतेय हीच खदखद आपल्या मुखातून बाहेर पडली अन् ;आपल्या परिवारव्देष्ट्या काही संधीसाधुंनी हीच सांध समजून विभागायचा प्रयत्न चालू केला. समाधानदादा ध्वनिचित्रफीत स्पष्टपणे जाणवतोय तो तुमच्या अंगी असणारा स्व.दादांचा वारसा आणि मा.कल्याणराव काळेंचा सामाजिक बांधिलकीचा नी समाज कल्याणासाठी घेतलेला वसा. ह्याच गोष्टी अंगीकारून आपण बांधवांनी समाजाला न्याय देण्यासाठी केलेले प्रयत्न घेतलेले कष्ट पण प्रत्येकवेळेस आपणास अभिप्रेत असलेले यश मिळतेच असे नाही.
समाधानदादा तुमच्यात जाणवतेय मशालीची ज्वाला पण ह्याच ज्वालेवर काहीजण कोलीतं पेटवून आपली भाकरी भाजण्याचा प्रयत्न करताहेत पण त्यांना काय माहिती ही ज्वाला तुमच्या हातातील कोलीत कधीच राख करेल नी त्याचा हाताला बसलेला चटका तुम्हाला उपाशीच ठेवेल.
ध्वनिचित्रफीत पाहिल्यावर मला जाणवला तो हा भाव.
समाधानदादा कारखाना उभारणीच्या काळात दादांनी अंगी ठेवलेल्या संयमानेच आजचं भाळवणीच्या माळरानावर उभं असलेलं नंदनवन पाहताना आनंद वाटतो नी तीच वृत्ती चेअरमन साहेबांच्या अंगी जाणवते नंतरच्या काळात जो झंझावात दादांनी तालुक्यातील जनतेला दाखवला तो निर्माण करण्याची जी भावना तुम्ही तुमच्या विचारातून वेळोवेळी बोलून दाखवताहात तो आपणा बांधवांच्या हातून घडावा अशी सदिच्छा.
ह्यावर एक सजग व्यक्ती म्हणून विचार करताना जाणवले की आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात "ध" चा "म" करून घडवून आणलेली कारस्थानी मनोवृत्ती आजही काहींच्या अंगी दिसतेय. आजही आपल्या आजूबाजूला फिरत असलेले महाभारत काळापासून कुप्रसिद्ध असलेले शकुनी(मामा) सारख्या वृत्तीच्या व्यक्ती ह्या सारीपाटावर फासे टाकून समोरच्याचा घात करायला लांडग्यांच्या टोळीप्रमाणे तयारच बसलेल्या आहेत.
माध्यमातून एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज पसरवताना माध्यम प्रतिनिधीने ठरवायचंय आपण भारतीय राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे चौथा खांब व्हायचंय की त्या खांबावर पाय वर करणारा प्रामाणिक म्हणवून घेणारा प्राणी.
योग्य वेळ आल्यावर आपणा बांधवामधील रामायणात वर्णिल्यासारखं बंधुप्रेम अख्खा समाज अनुभवेलच.
पण तोपर्यंत आपण संयमाने ठेवलेल्या शांततेस कोणी संधी समजून त्याचा फायदा घ्यावा अशी मनिषा बाळगणाऱ्यांनी खूणगाठ बांधावी की ह्या राष्ट्राचा इतिहास स्पष्टपणे सांगतोय की समोरच्या व्यक्तीच्या वाईट चिंतनात तुम्हीच अधःपतनात जाल.
ह्यासाठी एक समर्पक हिंदी वाक्य आठवतेय "जानी - जिनके घर शीसे के होते हैं, वह दुसरों पर पत्थर नही फ़ेंका करते।"