अभिनव अकॅडमी चे डॉ.सचिन लादे, डॉ मैत्रेयी केसकर, सोमनाथ गायकवाड यांच मार्गदर्शन लाभणार
करकंब प्रतिनिधी
नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व आणि सुत्रसंचालन कार्यशाळा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.सुरुवातीला आकाश थिटे, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक मिलिंद उकरंडे कवी प्रा.सतिश देशमुख, पत्रकार अध्यक्ष मनोज पवार,जागर टीमचे बापू खारे,परमेश्वर खारे आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे देवकी दुधाणे यांच्या शुभहस्ते चौंडेश्वरी मातेच पूजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात होत असताना कवी सतीश देशमुख सरांनी मनोगतात सांगितले की वक्तृत्व ही एक आपलं व्यक्तिमत्त्व विकास घडविणारी कला आहे.
त्यासाठी अभ्यास,वाचन,चारोळ्या,निरिक्षण,या संकल्पना मनात रूजवल्या पाहिजेत.वक्तृत्व कलेमुळे आपलं व्यक्तिमत्त्व उठाऊन दिसत त्यामुळे या कार्यशाळेचा पुरेपूर आनंद घ्या,अभ्यास करा असे सांगून स्वरचित कविता सादर करुन मंत्रमुग्ध केले,त्यानंतर आकाश थिटे,यांनी पहिल्या दिवशीच्या कार्यशाळेला सुरुवात करत असताना या कलेसाठी आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शक सूचना (टीप्स) सांगताना सांगितले की आत्मविश्वास, सुभाषिते,वाचन, अभ्यास, स्वतःचे मत,विषयाचा मुळ गाभा, समर्पक शेवट अशा पध्दतीच्या सुचना देताना जाहिरात करतानाचा आवाजाचा चढ उतार कसा असावा याविषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले या कार्यशाळेला विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक, गृहिणी, विद्यार्थी विद्यार्थिनी एकुण ६०जणांनी सहभाग नोंदवला,ही कार्यशाळा चार दिवस चालणार असून उद्या डॉ सचिन लादे, डॉ.मैत्रेयी केसकर, सोमनाथ गायकवाड यांच अनमोल मार्गदर्शन मिळणार असून सर्व इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केली.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे, देवकी दुधाणे, बापू खारे,विशाल बोधे, लेकीचं झाड टीम,जागर स्वच्छता टीम, श्रीराम प्रतिष्ठान करकंब आणि एकलव्य अभ्यासिका टीम अधिक परिश्रम घेत आहेत.