भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील आनंद देशपांडे यांच्या घरी चैत्रगौरीचा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी आनंद देशपांडे यांनी सांगितली की, ब्राह्मण समाजामध्ये चैत्रगौरीचा उत्सव दरवर्षी चैत्र शुद्ध तृतीया या दिवशी गौरीची स्थापना केली जाते. हा उत्सव अक्षय तृतीया पर्यंत साजरा केला जातो. महालक्ष्मी प्रमाणेच या चैत्रगौरीचा उत्सव केला जातो. मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी गौरीच्या समोरील बाजूस आरास करून समोर फराळाचे साहित्य ठेवले जाते. गौरी उत्सव म्हणजे गौरीचे डोहाळे जेवण करण्यात येते. गौरीला साडी, अलंकाराने सजवून सुहासिनींना हळदी कुंकवासाठी बोलावण्यात येते. त्यांना प्रसाद म्हणून कैरी घालून केलेली डाळीची चटणी, पन्हे दिला जातो.
तसेच त्यांची ओले हरभरे देऊन ओटी भरून पानसुपारी दिली जाते. असा हा उत्सव चैत्र महिन्यात प्रत्येक ब्राह्मण समाजातील घरामध्ये करण्यात येतो. गौरी समोर भजन,देवाची गाणी, महिलांचा गाण्याचा कार्यक्रमही केला जातो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घरातील सर्व मंडळी प्रयत्न करीत असतात आणि चैत्र गौरीच्या सणाची वर्षभर आठवण काढत असतात.