अकलूज प्रतिनिधी
जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षीअमोल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पंढरपूर विभागाच्या वतीने अकलूज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जगातील एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांगता आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक ,राजकीय नैतिक, धार्मिक अशा अनेक प्रकारच्या क्रांति घडवून आणल्या .अशा युग प्रवर्तक क्रांतिकारक महान अर्थशास्त्रज्ञ जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न ,प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व, महामानव जगातील आदर्श राज्यघटनाकार ,भारतरत्न डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्राध्यापक जगदाळे म्हणाल्या, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे सर्वांना मानसन्मान देऊन एकजुटीने मानवतावादी धर्माने राष्ट्रनिर्मिती करता येईल .सर्वांना बरोबरीचे स्थान देऊन आपण राष्ट्रनिर्मिती करू शकतो. फुले, शाहू,आंबेडकर यांच्या सर्वांची जी उत्कृष्ट विचारधारा आहे ती आपण सर्वांनी आचरणात आणायची कारण जगाच्या पाठीवर एक आदर्श लोकशाही देश म्हणून आपल्या भारताची ओळख आहे आणि अशा लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण अशी राज्यघटना लिहिणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापक मीनाक्षी अमोल जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूर पंढरपूर विभाग, शारदा चव्हाण अकलूज शहर कार्याध्यक्ष, पायल मोरे अकलूज माजी सरपंच, वनिता कोरटकर, रेश्मा विनायक गायकवाड ,नेहा माने, उज्वला अडाणे, वैष्णवी गायकवाड, सुजाता क्षीरसागर, संध्या गायकवाड स्नेहल गायकवाड तसेच जिजाऊ ब्रिगेड सदस्य उपस्थित होत्या.