सद्गुरू भजलिंग महाराज चंदनउटी निमित्ताने पाचदिवशीय प्रवचनमालेचा शुभारंभ
करकंब प्रतिनिधी
सद्गुरू श्री भजलिंग महाराज चंदनउटी अक्षयतृतीया निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य डॉ.श्री जयवंत महाराज बोधले यांची ५ दिवशीय प्रवचनमालेचे पहिलं पुष्प गुंफले. आज दुग्धशर्करा योग म्हणजे संत गोरोबाकाका समाधी सोहळया दिवशी करकंबकरांना अतिशय सुंदर सामान्य माणसालाही समजेल अशी अध्यात्मिक विचारांची पर्वणीच जयवंत महाराजांनी करकंबकरांना देताना सांगितले की वारकऱ्यांची नित्य संध्या म्हणजे हरिपाठ होय.याचबरोबर माऊलींची ज्ञानेश्वरी,चांगदेवपासष्टी, अमृतानुभव,ज्ञानदेवांचे अभंग,विचारसागर,हे ज्ञानाच भांडार माऊलींनी जगाला दिल पण त्याचे अधिकारी मात्र वेगवेगळे असलेलं दिसून येते परंतू सर्व सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजेल असा २७ अभंगांचा हरिपाठ लिहून लोकांना भक्तीची शिकवण दिली, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना अनुबंध आणि चतुष्ठेय माहिती होण गरजेच आहे म्हणजे त्या विषयात प्रवेश करताना तो त्या विषयाचा अधिकारी असला पाहिजे,विषयाचं ज्ञान घेता आलं पाहिजे,त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आणि शेवटी त्याच प्रयोजन काय याची माहिती असली पाहिजे तरच ते काम करण्यात यशस्वी होत,जीवनात मुक्ती मिळवायची असेल तर दररोज हरिपाठाच वाचन केलं पाहिजे,हे करीत असताना मुख्य फळ आणि अवांतर फळ दोन प्रकार पडतात.त्यासाठी प्रत्येकाला दुःख रहित सुख मिळवायच असेल तर हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गनना कोण करी हरिपाठ जीवनात अमलात आणावा लागेल अनुकूल वस्तू सुख देते पण त्याच वस्तूत बिघाड झाला की तिचं वस्तू प्रतिकुल बनते आणि दुःखाला कारणीभूत होते,यावर अनेक सुंदर दृष्टांत देत मंत्रमुग्ध केले,ज्या सुखातून दुःखाचा जन्म होतो ते विषयसुख आणि ज्या सुखात दुःखाचा लवलेशही नाही ते ब्रह्मसुख. जीव आत्मसुखाला प्राप्त होणे म्हणजे खरे सुख,जशी भावना तशी दृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी.
ज्याप्रमाणे दृष्ट्या खराब असेल तर जगही खराबच दिसते,यावर दुर्योधन आणि धर्मराजा हे सुंदर उदाहरण आहेत, वृत्ती मध्ये होणारा बदल म्हणजेच मुक्ती होय,माणसाने चारवाक प्रमाणे गोड बोलणं काम करून घेणारा असेल तर त्याला लोक भुलतात,परंतू ज्ञान मिळवण्यासाठी विवेक, वैराग्य,मनन,ध्यान,ध्यास असलाच पाहिजे श्रध्दावान लभते विद्या असं म्हटलेच आहे,ज्ञान प्राप्ती करीता संयम असणं आवश्यक आहे, तेंव्हा सर्वसामान्य लोकांना कर्म समजत नाही,योग यज्ञ जमत नाही मग काय केलं पाहिजे तर देवाचिये द्वारी उभा क्षण भरी.. यासाठी नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे...अशी सुंदर उदाहरण देत सर्व भक्त भाविकांना मंत्रमुग्ध करत ते देवाचं द्वार कोणतं,ते उद्याच्या दुसऱ्या दिवशी ऐकायला सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
प्रवचन माला यशस्वी करण्यासाठी सद्गुरू भजलिंग महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब वास्ते, चंद्रकांत वास्ते विद्याताई वास्ते, ज्ञानेश्वर दुधाणे, कपींद्र रेडे पाटील,विश्वास जोशी आदी अधिक परिश्रम घेत आहेत.