भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत असंघटित बांधकाम व इतर कामगार यांना दुपारचे मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे होत्या.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक ई .बा.मुलाणी,जिल्हा अध्यक्ष सुवर्णताई शिवपुरे,पांडुरंगाचे संचालक भगवान चौगुले, विठ्ठलचे माजी संचालक विलास देठे,संचालक शहाजी साळुंखे, शिवसेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर,आघाडीचे नेते विजय शिंदे,सरपंच राजकुमार पाटील,उपसरपंच सविता लोखंडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर बालाजी खंदारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी काळे म्हणाले की या गावातील कामगारांना मध्यहन भोजनाचा आनंद तालुक्यात प्रथम आपल्या गावाला मिळाला आहे.तसेच या परिसरातील महिला, बचत गट,ग्रामस्थ यांना काही मदत पाहिजे असेल तर आम्ही करू.असे हि काळे म्हणाले.
यावेळी म्हेत्रे म्हणाल्या की सोलापूर जिहल्यातील हे पहिलेच गाव आहे की येथील कामगारांना मध्यान्ह भोजन मिळणार आहे.यामागे येथील महीलाचा सहभाग मोठा आहे.त्यामुळे हे शक्य झाले आहे.महील्यांच्या प्रश्नावर चर्चा केली जात आहे.महिलांना शासनाच्या विविध योजनात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले जात आहे.त्यामुळे येथील महिलांची प्रगती होताना दिसून येत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला तालुका अध्यक्ष राजश्री ताड यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.हणमंत जमदाडे यांनी केले.तर आभार रणजित जाधव यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुनील पाटील,राजाभाऊ ताड,संतोष लिंगे,दादा बुरांडे,माणिक पिंजारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी परिसरातील महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.