पंढरपूर प्रतिनिधी
आमदार आवताडे ज्या योजनेसाठी आपले कसलेही प्रयत्न नाहीत, कसलाही पाठपुरावा नाही त्या कामाचे उदघाटन आपण केले.नुकतेच गादेगाव येथे केले. सदर कामाची मंजुरी रणजित बागल यांनी आणली होती.असा खुलासा रणजित बागल यांनी केला आहे.
त्या बाबत माहिती अशी की,पंढरपूर तालुक्यातील गादेगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना व्हावी यासाठी मी तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे मागणी केली होती.(संबंधीत पत्र)
या मागणीची दखल घेत तत्कालीन मंत्री बनसोडे यांनी तात्काळ त्या पत्रावर सकारात्मक शेरा देवुन योजना मंजुर केली व संबंधीत अधिकारी वर्गास योजने संदर्भात काम सुरू करण्याचे आदेश दिले.
आमदार समाधान दादा आवताडे जेव्हा मी या कामाला तत्त्वतः मान्यता मिळवुन घेतली तेव्हा आपण आमदार सुध्दा नव्हता. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या आधीच ही मंजुर झालेली योजना आपण मी मंजुर करून आणली अशा आशयाचे बॅनर लावुन धडधडीत जनतेला खोटेपणा दाखवलात.असे जनतेस फसवू नका.
आपण काम करा लोकांना सुविधा मंजुर करून आणा मग त्याचे श्रेय घ्या त्याचं स्वागत करू. पण स्वतः मी मंजुर करून आणलेले काम सुध्दा "मीच केलं" या अविर्भावात दिमाखात उदघाटन उरकले.हि अतिशय चुकीची राजकीय पद्धत झाली आहे .
या मतदारसंघाचा इतिहास आठवा आमदार , या मतदारसंघातून भारतनानांसारखे असेही आमदार होवुन गेले की काम मंजुर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आणि उद्घाटनासाठी धडपड कधी केली नाही. आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवाल अशी अपेक्षा होती पण त्या अपेक्षेची उपेक्षा केली आहे.
काम न करता दुसर्यांच्या कामाचे श्रेय घेणे ही जबाबदार लोकप्रतिनिधींची भुमिका अत्यंत चुकीची आणि तितकीच हास्यास्पद आहे. निदान उदघाटन करून नेमकं मीच मंजुरीसाठी प्रयत्न केलेल्या कामाचे केले. आमदार हे वागणं बरं नव्हे.