मायणी प्रतिनिधी
चितळी गावामध्ये मुसळधार पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेती पिकं उध्वस्त झाली असून घरे जनावरांची शेड पडली असून या अपघातामध्ये अनेक जनावरे मरण पावली रात्री पाऊस पडल्यानंतर सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी शिवसेना पदाधिकारी यांनी तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क करून तातडीने पंचनामे करण्यासाठी मागणी केली आहे.
यावेळी तहसीलदार किरण जमदाडे यांनी लगेच आदेश दिले व सकाळी 10 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पशु वैद्यकीयअधिकारी डॉ. ठोंबरे यांनी दुखापत जनावरे व मयत जनावरे यांचे पंचनामे केले तसेच कृषी अधिकारी यांनी शेतामध्ये जाऊन पंचनामे केले.
तसेच ग्रामसेवक यांनी शाळेमध्ये पडलेले इमारतीचे पंचनामे केले व विद्युत डांब अनेक ठिकाणी पडल्यामुळे विद्युत पुरवठा बंद असल्याने नाटकर यांच्याबरोबर विद्युत कर्मचारी टीम कालपासून सक्रिय झाली आहे.
गारपिट मुळे टोमॅटो गहू असे अनेक पिके उध्वस्त झाली झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना सरसकट मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रयत्न करणार असून शिवसेनेच्या प्रयत्नातून कारभार वाडा परिसरामध्ये नवीन डीपी मंजूर करून आणला असून येत्या काही दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहे.शेतकरी मित्रांनी पंचनामेसाठी काही अडचणी येत असल्यास शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसी संपर्क साधावा.